प्रतिनिधी / बेळगाव :
विसाव्या शतकातील पहिले दिगंबर आचार्य चरित्र चक्रवर्ती शांतीसागर महाराज यांच्यावर पोस्टल तिकीट काढण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. समस्त जैन समुदायाच्यावतीने केंद्र सरकारकडे ही मागणी करण्यात आली आहे.
आचार्य शांतीसागर फौंडेशन, दक्षिण भारत जैन सभा, भरतेश एज्युकेशन ट्रस्ट, अखिल भारतीय जैन सभा आदी संघटनांनी ही मागणी केली आहे. आचार्य शांतीसागर फक्त जैन संत म्हणून परिचित नव्हते. इतर धर्मियांनाही त्यांचा आदर होता. इतर धर्म, समाज व राष्ट्र उभारणीत त्यांची शिकवण महत्त्वाची ठरली आहे. मुनी म्हणून दीक्षा घेऊन या महान कार्यात ते सहभागी झाले. त्या सोहळय़ाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. याची दखल घेऊन ही मागणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती पंतप्रधानांपासून सर्व संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींना पाठविण्यात आल्य़ा आहेत.