‘बंद’ला खानापुरात संमिश्र प्रतिसाद : अनेक व्यावसायिकांनी दुकाने ठेवली बंद
वार्ताहर /खानापूर
बेळगाव येथे कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी आयोजित केलेल्या म. ए. समितीच्या महामेळाव्याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर काही कन्नडिगांनी शाईफेक करून केलेला भ्याड हल्ला हा नपुसकांचा हल्ला म्हणावा लागेल. चोरटय़ा मार्गाने करवेच्या गुंडांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ म. ए. समितीच्यावतीने बंदची हाक दिली होती. यानुसार खानापूर तालुक्मयातही या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुपारपर्यंत मराठी भाषिक तसेच इतर भाषिकांनीही आपापले व्यवसाय बंद ठेवून प्रतिसाद दिला. मात्र दुपारनंतर तुरळक प्रमाणात बाजारपेठेत गर्दी झाली होती.
या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ खानापूर तालुका म. ए. समितीची शिवस्मारकात समितीचे अध्यक्ष देवाप्पा गुरव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला.
प्रारंभी सचिव गोपाळराव देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत करून महामेळाव्याचे विवरण केले व मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाईफेक करून केलेल्या घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृत झालेल्या सीडीएस बिपीन रावत व अन्य कमांडर व त्यांच्या कुटुंबीयांतील मृत सदस्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना ता. पं. माजी सदस्य पांडुरंग सावंत यांनी, सीमाभागावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी दरवषी बेळगावात होणाऱया हिवाळी अधिवेशनप्रसंगी म. ए. समितीतर्फे महामेळाव्याचे आयोजन करून सरकारचे लक्ष वेधले जाते व निषेध नोंदवला जातो. असे असताना मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना पोलिसांनी बाजूला बोलावून चर्चेसाठी निमंत्रण केले. दरम्यान छुप्या मार्गाने आलेल्या करवेच्या काही गुंडांनी दीपक दळवी यांच्यावर शाईफेक करून भ्याड हल्ला केला हे निदंनिय आहे. या कृत्यामुळे समस्त मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या आहेत. यासाठी सीमाभागातील समस्त मराठी भाषिकांनी एकीच्या झेंडय़ाखाली येऊन आपल्या अस्मितेची जाण राखावी व या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी सुरेश देसाई म्हणाले, शांततेच्या मार्गाने न्याय मागणाऱया संघटनेवर कन्नडिगांनी चोरटय़ा मार्गाने भ्याड हल्ला करणे हे निषेधार्थ आहे. यावेळी कार्यकारिणी सदस्य पी. एच. पाटील, सूर्याजी पाटील, गोपाळराव पाटील आदीनी या घटनेचा निषेध नोंदवणारी भाषणे केली. बैठकीला कार्यकारिणी सदस्य दत्तू कुटे, रविंद्र पाटील, अजितराव पाटील, किरण पाटील, विनायक सावंत, मारुती गुरव, युवा समितीचे राजू पाटील, राजू कदम, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील यांचा समावेश होता.