प्रतिनिधी / व्हनाळी
ज्या मोबाईल फोनला एकेकाळी शाळा महाविद्यालयात वापरण्यास बंदी होती तोच मोबाईल आता लॅाकडावुनच्या शाळा बंद काळात शिक्षणाची खरीखुरी गरज बनला असून मुलांची शाळा आता मोबाईलवरच सुरू आहे. ब-यापैकी शाळांनी मुलांना अॅनलाईल अभ्याक्रमाचे धडे देत मुलांना या लॅाकडावूनच्या काळात आभ्य़ासात गुंतवून ठेवण्याचा वेगळा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याला पालकही चांगला प्रतिसाद देत असून मुलांचा शैक्षणिक दर्जा टिकून राहण्यासाठी मोबाईलचा असा चांगला उपयोग होत असल्याने पालकांतून समाधान व्यक्त होत आहे. करोनामुळे 31 मार्च पासून शाळा बंद ठेवण्याच्या निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. त्यामुळे एप्रिलमध्ये होणार्या परीक्षेपर्यंत अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा असा प्रश्न शाळा प्रशासनासमोर निर्माण झाला होता. यावर तोडगा काढण्यासाठी काही शाळांनी विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम थेट ऑनलाईन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शाळांनी वेबसाईट व पोर्टलचा पर्याय निवडला असून, या माध्यमातून शिक्षकांना विद्यार्थ्यांना घरबसल्या शिकवता येणार असल्याची माहिती शाळांकडून देण्यात आली होती.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून लॉकडाउन जाहीर करण्यापूर्वी शाळा बंद करण्यात आल्या. शाळांचे दरवाजे बंद झाले, तरी शिक्षणाची असंख्य कवाडे खुली झाली आणि त्यातील एक म्हणजे ‘दीक्षा अॅप’. या अॅपच्या एकूण वापरापैकी सर्वाधिक म्हणजेच तब्बल ४६.५ टक्के महाराष्ट्रातील वापरकर्त्यांचा सहभाग आहे. खरतर २०१८मध्ये हे अॅप कार्यन्वित करण्यात आले. परंतु, या अॅपचा प्रभावी वापर लॉकडाउनमध्ये झाला. आणि या वापरात महाराष्ट्र अग्रेसर आल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यामध्ये करोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवेसेंदिवस वाढ होत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव राज्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आला . यामध्ये सरकारी शाळेतील शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश दिले असले तरी खासगी शाळा चालकांनी शिक्षकांनाही सुट्टी दिली आहे. करोनामुळे शाळा बंद ठेवाव्या लागत असल्याने विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम बुडण्याची शक्यता आहे. त्यातच एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द केल्याने पुढील शैक्षणिक अभ्यासक्रम कसा घ्यायचा असा प्रश्न शाळा प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक खासगी शाळांनी विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ऑनलाईनला प्राधान्य दिले आहे. काही शाळांनी वेबसाईटच्या माध्यमातून तर काही शाळांनी स्वतंत्र पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम सुरू ठेवण्यावर भर दिला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून दिक्षा अॅप द्वारे अभ्यासक्रमाचा गेली 50 दिवस उपक्रम राबविला जात आहे. कोरोनाच्या पार्शवभुमिवर सुरू असलेले कल्लासेस देखील आता मोबाईलद्वारे सुरू ठेवून विद्यार्थ्यांचा शैक्षिणिक अभ्यासक्रमाला सुरूवात केली असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुधारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.
शासनामार्फत शिक्षण स्तरावरील विविध मोबाईल अॅप द्वारे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम सद्या सुरू आहे. स्कॅालरशिप व इतर शिक्षणासंदर्भात शिक्षकांना प्रशिक्षण वर्गाद्वारे मार्गदर्शन सुरू आहे. तसेच विद्यार्थांना देखील व्हॅाटसअॅपद्वारे अभ्यासक्रम सुरू आहे. त्यामुळे लॅाकडावून शाळा बंदकाळात शिक्षक ,पालक आणि विद्यार्थी यांच्यातील संपर्क जोडण्याचे चांगले काम सध्या मोबाईल करत आहे.
डॅा.जी.बी.कमळकर गटशिक्षणाधिकारी पं.स.कागल
दिक्षा अॅप द्वारे गटशिक्षणाधिकारी, शिक्षकांमार्फत मोबाईलद्वारे विद्यार्थ्यापर्यंत हा अभ्यासक्रम पोहचवला जात आहे. लॅाकडावूनमध्ये शैक्षणिक वातावरण ,गुणवत्ता टिकूण राहण्यासाठी या अॅपचा चांगला उपयोग होत आहे .शिवाय यामुळे मुलांमध्ये शिक्षणाचा खंड पडत नाही. महाराष्ट्र हे सर्वाधिक दिक्षा अॅप वापरणारे राज्य आहे याचा गुणवत्ता वाढीसाठी उपयोग होत आहे.
आशा उबाळे जिल्हा शिक्षणाधिकारी