महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कणकवली आगार व्यवस्थापकांना निवेदन
प्रतिनिधी / कणकवली:
कोरोनामुळे सन 2021 – 2022 शैक्षणिक वर्ष उशिराने चालू होत आहे. 2 सप्टेंबरपासून इयत्ता दहावी, बारावी आणि 4 ऑक्टोबरपासून पाचवी ते आठवी, नववी, अकरावीचे वर्ग शासनाच्या आदेशाप्रमाणे नियमितपणे सुरू केलेले आहेत. उच्चशिक्षण वर्ग सुद्धा 20 ऑक्टोबरपासून सुरू झालेले असल्याने ग्रामीण भागात जाणाऱया शालेय फेऱया नियमित वेळेत सोडण्यात याव्यात, अशी मागणी मनसेच्यावतीने आगार व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात जाणाऱया व येणाऱया गाडय़ांच्या वेळा या पूर्ण कालावधीपूर्वी जशा नियमित होत्या त्याचप्रमाणे करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मनसेच्या विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष सुरज नाईक, विराज सरंगले, विजय चव्हाण, स्वप्नील शिरसाट आदी उपस्थित होते.