थर्मल स्क्रीनिंग करूनच विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश, कोरोना नियमावलीचे पालन
प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षण खात्याच्या आदेशानुसार सोमवारपासून पूर्णवेळ शाळा भरविण्यात आली. सहावी ते दहावीपर्यंतचे वर्ग पूर्ण क्षमतेने भरविण्यात आले. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारने पूर्णवेळ शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. बेळगाव शहर व तालुक्मयात सोमवारपासून शाळा भरविण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
राज्यात 23 ऑगस्टपासून 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा व कॉलेजीस सुरू करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाणे शक्मय नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग सुरू ठेवण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात केवळ 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. परंतु हळूहळू या उपस्थितीत वाढ होत गेली. त्यानंतर 6 सप्टेंबरपासून 6 वी ते 8 वी पर्यंतचे वर्ग भरविण्यात आले. सकाळी 10 ते दुपारी 1.40 अशी अर्धवेळ शाळा भरविली जात होती. 40 मिनिटांचा एक तास या प्रमाणे दररोज 5 तास शिकविले जात होते.
कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळे सोमवार दि. 4 ऑक्टोबरपासून पूर्णवेळ शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यानुसार सोमवारपासून वर्ग भरविण्यात येत आहेत.
पूर्णवेळ शाळा भरविण्यात येत असली तरी अद्याप माध्यान्ह आहार सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनाच घरातून जेवणाचा डबा घेऊन यावा लागला. पूर्णवेळ शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.
आजारी विद्यार्थ्यांबाबत विशेष खबरदारी
थर्मल स्क्रीनिंग करूनच विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे. सध्या विद्यार्थी आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. वातावरणात वारंवार होत असलेल्या बदलांमुळे सर्दी, पडसे व खोकला या आजारांनी विद्यार्थी त्रस्त आहेत. त्यामुळे आजारी विद्यार्थ्यांबाबत शाळांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. आजारी विद्यार्थी व त्यांच्या पालकांना पूर्वसूचना देण्यास सांगण्यात आले असून, अशा विद्यार्थ्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
सोमवारपासून पूर्णवेळ शाळा सुरू करण्यात आली. 6 वी ते 10 वी चे वर्ग पूर्णवेळ व पूर्ण क्षमतेने भरण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येत आहे. आजारी विद्यार्थ्यांबाबत खबरदारी घेतली जात असल्याचे ठळकवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र कुडतुडकर यांनी सांगितले.