बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असताना अशा परिस्थितीत शाळा सुरू करण्यास घाई करणे योग्य ठरणार नाही. कोणताही धोका पत्करून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून शाळा सुरु करू नयेत असे जनता दल(एस)चे अध्यक्ष एच. के. कुमारस्वामी यांनी म्हंटले आहे.
जयप्रकाश नारायण या पक्षाच्या कार्यालयाच्या इमारतीत सिरा आणि राजराजेश्वरनगर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या संवाद कार्यक्रमात भाग घेण्यापूर्वी त्यांनी, हजारो विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन राज्य सरकारने केवळ ऑनलाइन वर्गांना परवानगी दिली पाहिजे. राज्यात शाळा सुरु करण्याची घाई करू नये. ग्रामीण भागात प्रशासकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा नाहीत, असेही त्यांनी म्हंटले आहे.