कोरोना साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत़ यामुळे शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आह़े राज्य सरकारने 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आह़े शिक्षण संस्था तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याकरिता शिक्षकांनी व व्यवस्थापनाने पूर्वतयारी सुरू केली आह़े आतापर्यंत थोडक्या प्रमाणात सुरू झालेल्या शाळांमधून कोरोना लागण किंवा प्रसाराची उदाहरणे समोर आलेली नाहीत, यामुळे व्यापक स्वरूपात शालेय शिक्षण सुरू करण्याचा निर्णय योग्य प्रकारे मार्गी लागेल, अशी शक्यता आह़े
राज्य सरकारने कोरोना नियमनाविषयी धोरणात्मक निर्णय घेतल़ा शहरी भागात 8वी ते 12 आणि ग्रामीण भागात 5वी ते 12 वी असे वर्ग सुरू करण्याविषयी सूचना देण्यात आल्य़ा 4 ऑक्टोबरपासून शाळांचे वर्ग सुरू करण्याकरिता पावले उचलली जात आहेत़ खासगी शिक्षण संस्थांच्या शाळा स्वच्छ करून त्या विद्यार्थ्यांना उपयोगात आणता याव्यात याकरिता साफसफाईसह दुरूस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत़ जिल्हा परिषदेच्या शाळात देखील अशीच पूर्वतयारी सुरू करण्यात आली आह़े
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या शिफारशीप्रमाणे शाळा सुरू करणाऱया शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आह़े केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सर्व राज्यांना सूचना दिल्या होत्या की 5 सप्टेंबर शिक्षक दिनापर्यंत सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण व्हाव़े शासकीय सूचना देण्यात आल्या असल्यातरी प्रत्यक्षात सर्व जिह्यांमध्ये असे लसीकरण पूर्ण झालेले नाही ही वस्तूस्थिती आह़े यामुळे शिक्षकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा रा†िहला आह़े
रत्नागिरी जिह्यात प्राथमिक शिक्षण विभागामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण व्हावे, म्हणून कार्यक्रम हाती घेण्यात आल़ा यामध्ये 2662 शाळांमध्ये लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आल़ी आतापर्यंत 6182 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांनी लसीच्या दोन मात्रा घेतल्य़ा तर 6900 शिक्षकांनी केवळ पहिला डोस घेतल़ा एकही डोस न घेतलेल्या शिक्षकांची संख्या 260 इतकी आह़े माध्यमिक आणि प्राथमिक विभागातील सर्व शिक्षकांच्या लसीकरणाकडे जिल्हा परिषद प्रशासन लक्ष ठेवून असतानाही 100 टक्के लसीकरण पूर्ण होऊ शकले नाह़ी सिंधुदुर्ग जिह्यात 1390 शाळा असून 3 हजार 615 शिक्षक कार्यरत आहेत़ त्यापैकी 3435 शिक्षकांचा पहिला डोस झाला असून दोन्ही डोस पूर्ण करणाऱया शिक्षकांची संख्या 2890 एवढी आह़े 180 शिक्षकांचा एकही डोस झालेला नाह़ी
आतापर्यंत शाळांचे काम प्रामुख्याने ऑनलाईन स्वरूपात सुरू होत़े त्यामुळे शिक्षक घरात राहून मुलांना शिकवत होत़े संपर्क नसल्याने संसर्गाचा प्रश्न नव्हत़ा तथापि प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत येणारे विद्यार्थी संसर्गापासून दूर व्हावेत याकरिता शिक्षक मात्र लसीकरण झालेले असावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े यापूर्वी कोकणात बाधित शिक्षक आढळून आल्याने शिक्षण संस्थांची मोठी धावपळ उडाली होत़ी तथापि यापुढे अधिक काटेकोर राहण्याच्या सूचना जिल्हा परिषदेने दिल्या आह़ेत यामुळे याखेपेला शाळास्तरावर अधिक काळजी घेण्यात येईल हे मात्र
नक्क़ी
शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळतेच पण त्याचबरोबर सहजीवन, क्रीडा यासारख्या बाबीतून निखळ आनंद मिळत असत़ो कोरोना काळात मुले घरोघरीच थांबल्यामुळे सुरवातीला काही दिवस सुट्टीचा आनंद घेता आला पण लवकरच मुलांना कधी शाळा सुरू होणार असे वाटू लागले. मुले शाळा सुरू होण्याची वाट पाहत होत़ी जिल्हा परिषदांच्या शिक्षकांनी वाडीवस्तीवर असलेल्या निवाराच्या ठिकाणी मुलांचे एकत्रीकरण करून शालेय शिक्षणाची पावले टाकली जावीत म्हणून प्रयत्न केल़े वयानुरूप किंवा इयत्तेशी अनुकूल शिक्षण प्रवाहात मुले रहावीत म्हणून प्रयत्न केल़े
काही शिक्षकांनी शासकीय धोरण काहीही असलेतरी ग्रामीण भागात कोरोनामुक्त गावात गुपचूपपणे विद्यार्थ्यांना शाळेत बोलावल़े वर्ग उघडायचे नाहीत म्हणून व्हरांडय़ात बसून मुलांसाठी तासिका घेतल्य़ा शाळेचे पूर्णवेळ शिक्षण घेता आले नाही तरी दिवभरातील काही मुले शिक्षकांच्या संपर्कात येत होत़ी त्यामुळे काही प्रमाणात शिक्षणाशी त्यांचा संबंध टिकून
राहिल़ा
काही शिक्षकांनी सांगितले की, आमचा गाव कोरोनामुक्त आहे, अशा परिस्थितीत शिक्षण थांबवणे योग्य नाही म्हणून जिथे संधी मिळेल तेथे मुलांना एकत्र करून आम्ही काम सुरू ठेवले आह़े मुलांना पाहिल्याशिवाय आम्हाला बरे वाटत नाह़ी मुख्य म्हणजे सध्याची शिक्षण व्यवस्था ही प्रत्यक्ष अध्यापन, अध्ययनाची आह़े ऑनलाईन स्वरूपासाठी ती तयार झालेली नाह़ी असे असताना ऑनलाईन शिक्षणाची पूर्तता झाली असे म्हणणे केवळ वरकरणी समाधानाचे होत़े
यापूर्वीच्या टप्प्यात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यांमध्ये माध्यमिक शाळांमध्ये कामकाज सुरू झाल़े रत्नागिरी जिह्यात 60 हून अधिक शाळांमध्ये काही विद्यार्थी येऊन शिक्षण घेऊ लागले होत़े मात्र आता सरसकट सर्वच शाळांमध्ये शिक्षणक्रम सुरू होणार आह़े त्यासाठी चौकटी घालून देण्यात आल्या आहेत़ कोणत्याही परिस्थितीत कोविड नियमांचे परिपूर्ण पालन झाले पाहिजे, असा आग्रह आरोग्य विभागाचा आह़े सामाजिक अंतर, मुखपट्टी आणि हातांची स्वच्छता असे मुद्दे यापुढे आणखी काहीकाळ पार पाडावे लागतील़, याची सर्वांना जाणीव आह़े
कोकणातील शिक्षक मंडळी अधिक काटेकोर राहून अध्यापनाचे काम करत असतात़ त्यामुळे कोरोना सरताना सर्व अटींचे पालन शिक्षक वर्गातून स्वयं प्रेरणेने केले जाईल. त्यासाठी शिस्तीचा बडगा दाखवावा लागणार नाही, असा विश्वास शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकारी व्यक्त करत आहेत़ त्याचबरोबर सामाजिक अंतराच्या सूचना शाळास्तरावरू विद्यार्थ्यांना देण्यात येत असल्या तरी त्याची अंमलबजावणी होणे मात्र कठीण असल्याचे सांगण्यात आल़े मुलांना सुचित केले असली तरी मुले एकमेकांच्या थेट संपर्कात येतील़ अनेक दिवस मैदानापासून दूर राहिलेली मुले खेळ मांडण्याचा सुद्धा प्रयत्न करतील़ अशावेळी त्यांना हाताळणे हे शिक्षकांसाठी अधिक कौशल्याचे असेल, असे मत खात्याचे वरिष्ठ अधिकारी व्यक्त करत आहेत़
सुकांत चक्रदेव