दोन वर्षांनंतर शाळेत बसल्यावर विद्यार्थी उत्साही. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे स्वागत. विद्यार्थ्यांबरोबर पालकांचीही डय़?टी सुरू. एक दिवसाआड वर्ग भरणार.
डिचोली/प्रतिनिधी
तब्बल दोन वर्षांनंतर प्राथमिक व माध्यमिक स्थरावरील विद्यार्थ्यांची शाळांमध्ये पाठवणी करताना विद्यार्थ्यांपेक्षा जास्त करून पालकांच्या तोंडावर प्रचंड उत्साह पहिल्या दिवशी दिसून आला. दोन वर्षे घरातच घालविल्यानंतर शाळेत जाण्यासाठी उत्सुक असलेले विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात उत्साही होतेच. त्यातच त्यांचे प्रत्येक शाळांमध्ये चांगलेच स्वागत करण्यात आल्याने त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. अंगावर शाळेचा गणवेश नसला तरी अनेक विद्यार्थ्यांच्या तोंडावरील बऱयाच काळानंतर शाळेचे असलेले कुतूहल मात्र पाहण्यासारखे होते. शाळांमध्ये तब्बल दोन वर्षांनंतर किलबिलाट सुरू झाला आहे.
तब्बल दोन वर्षांच्या कलावधीनंतर राज्यातील प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालये पुन्हा सुरू होणार या बातमीनेच अनेक विद्यार्थ्यांच्या मनात मोठा उत्साह आणि आनंद निर्माण केला होता. गेल्या आठवडय़ात आलेल्या या बातमीने तर विद्यार्थ्यांपेक्षा पालकांना अधिकच सुखावले होते. कारण गेली दोन वर्षे या कोवीड माहामारीपेक्षा लहान मुलांमुळे कशी आव्हानात्मक होती याची पूर्ण कल्पाना पालकांना होतीच. त्यामुळे शाळा हायस्कूल सुरू होण्याच्या वृत्तानेच पालकांची मने सुखावली होती.
कोवीड 19 सुरू झाल्यानंतर 2020 मध्ये साधारणतः फेब्रुवारी महिन्यातच राज्यतील शाळा हायस्कूल सुरक्षेचे उपाय म्हणून बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर मार्च महिन्यात थेट लॉकडाउन करण्यात आल्यानंतर राज्यातील सर्वच व क्षण व्यवस्था, व्यवहार ठप्पच झाले होते. कोवीडची प्रकरणे चालूच राहिल्याने तसेच पहिला, दुसरी आणि आता तिसरी लाट टप्प्याटप्प्याने आल्याने शाळा सुरू करण्याची संधीच सरकारला मिळाली नाही. त्यामुळे सुमारे दोन वर्षे मुलांना शाळा हायस्कुलपासून दूर रहावे लागले. नववी, दहावी, उच्च माध्यमिक, महाविद्यालय या सरखी शिक्षण संस्था कोवीड मार्गदर्शक तत्वा?चा अवलंब करून सुरू होती. परंतु प्राथमिक व माध्यमिक स्थरावरील शाळा हायस्कूल बंदच असल्याने पालकांनाही कधी एकदाची शाळा सुरू होते, याची प्रतिक्षा लागून राहिली होती.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ओवाळणी व स्वागत.
तब्बल दोन वर्षांनंतर शाळेचा पहिला दिवस अनुभवलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षक वर्गातर्फे चांगलेच स्वागत करण्यात आले. विठ्ठलापूर साखळी येथील सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवेश द्वारावर विशेष ओवाळून आत घेण्यात आले. हा क्षण सर्व.विद्यार्थांसाठी वेगळाच होता. विद्यार्थ्यांच्या तोंडावरील स्मितहास्य आणि भाव पाहण्यासारखे होते. अनेक दिवसांनंतर शाळेच्या भिंती आपल्या लाडक्मया विद्यार्थ्यांचा आवाज ऐकणार होत्या. आणि शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारीही शाळेतील विद्यार्थ्यांची किलबिलाट ऐकण्यास किती आतूर झाले होते. याची प्रचिती सदर ओवाळून करण्यात आलेल्या स्वागतातून दिसून आली. साखळीतील प्रोग्रेस हायस्कूलमध्ये तर विशेष सजावट करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शिक्षकांनी विशेष गीत गात विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या हायस्कुलमधील सजावट व स्वागताची पध्दत मात्र लक्षवेधीच होती. डिचोली येथील शाळा हायस्कुलांमध्येही अशाच प्रकारे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच बहरून आला होता.
एका बाकावर एक विद्यार्थी तर एका दिवसा आड दोन इयत्ता.
शाळेतील विद्यार्थी आणि वर्ग, बाक याची जुळवणी करून घेत एक दिवस पहिली व दुसरी तर दुसऱया दिवशी तिसरी व चौथी इयत्ता अशा प्रकारे दिवस ठरविण्यात आले आहेत. काल सोमवारी पहिल्या दिवशी इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यात आले होते. तर आज मंगळवारी इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले आहे. अशा प्रकारे एका दिवसा आड एक असे वर्ग भरविण्यात येणार आहे. कोवीड मार्गदर्शक तत्वा?चे पालन व्हावे यासाठी एका बाकावर एक विद्यार्थी बसविण्यात येत आहे. मास्क सक्तीचे आणि बेगेत सेनिटाईझर महत्वाचा अशी सुचना शाळा व्यवस्थापन आणि व शिक्षकांतर्फे देण्यात आली आहे. या सुचनांचे पालक प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी केल्याचे पहिल्या दिवशी दिसून आले.
हा फेब्रुवारी महिना सुरू असल्याने तसेच शाळा सुरू होण्याचा अंदाज नसल्याने विद्यार्थ्यांना गणवेश शिवून घेतला गेला नव्हता. शाळा हायस्कूल सुरू करण्याचे अचानक परिपत्रक आल्याने गणवेशाची समस्या अनेकांच्या समोर आली. मात्र सरकारने गणवेश नसलेल्यांना सक्ती करण्यात न आल्याने अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक निर्धास्त बनले. त्यामुळे अंगावर शाळेचा गणवेश जरी नसला तरी विद्यार्थ्यांच्या तोंडावर शाळेच्या पहिल्या दिवसाचे कुतूहल मात्र मोठे होते.