दोडामार्ग – वार्ताहर-
मायनींग क्षेत्रातील पाण्याचा बांध फुटून प्रचंड नुकसानी झालेल्या कळणे मधील शेतकरी ग्रामस्थांना येत्या पंधरा दिवसात शासनाकडून संपूर्ण भरपाई दिली जाईल असे ठोस आश्वासन आमदार दीपक केसरकर यांनी दिले. तसेच राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे कळणे माईनवर कारवाई करण्याची मागणी देखील आमदार केसरकर यांनी केल्याने कळणेवासीयांनी काल स्वातंत्र्यदिनी छेडलेल्या आपले उपोषण रात्री 9 वाजता मागे घेतले. तहसीलदार अरुण खानोलकर तसेच मंडळ अधिकारी राजन गवस यांच्या हस्ते लिंबू पाणी घेत ग्रामस्थांनी उपोषण सोडले.