प्रतिनिधी/ सातारा
राज्य सरकारने काढलेल्या विधवा विवाहाचा अध्यादेश हा त्रोटक असून त्यात पूर्णपणे बदल करण्यात यावा. हेरवाड गावाच्या अगोदर सातारा तालुक्यातील जकातवाडी या गावांमध्ये विधवा प्रथा पूर्णपणे बंद करण्याचा अनोखा ठराव घेतला होता. त्याचा पूर्वइतिहास राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा प्रा. कविता म्हेत्रे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मांडला. तसेच जकातवाडी ग्रामस्थांनी सर्व पुरावेच त्यांना सादर केल्याने सुप्रियाताईंनी या अद्यादेशात बदल करायला मी विनंती करते, असे आश्वासन ग्रामस्थ आणि प्रा. कविता म्हेत्रे यांना दिले.
विधवा विवाह प्रथा बंद व्हावी, विधवा असलेल्या महिलेचा पुन्हा विवाह करण्याचा आणि त्यांना प्रोत्साहन म्हणून 20 हजार रुपये देण्याचा ठराव डिसेंबर 2018 ला सातारा तालुक्यातील जकातवाडी या गावाने घेतला आहे. त्यावेळी सातारा जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सभांमध्ये जकातवाडी या गावाचे अभिनंदन झाल्याचे ठराव झाले होते. असे असताना राज्य शासनाने जकातवाडी या गावाऐवजी हेरवाड या गावाचा उल्लेख करून आदेश काढण्यात आला. वास्तविक त्या आदेशात अनेक त्रुटी व वरवरचा असल्याने जकातवाडी या गावाने जो ठराव घेतला आहे. त्याप्रमाणे आदेश निघणे उचित ठरणार आहे. त्याच अनुषंगाने जकातवाडी ग्रामस्थांनी आज प्रा. कविता म्हेत्रे यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. त्यांनी ग्रामस्थांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करत कविताताईंनी मला सांगितले होते. जकातवाडी गावचा विषय मला चांगला माहिती आहे. शासन निर्णय बदलण्यासाठी मी प्रयत्न करेन अशी ग्वाही त्यांनी दिली.
सुप्रियाताईंना ग्रामस्थांनी दिले निवेदनासोबत पुरावे
खासदार सुप्रियाताई यांना निवेदन देताना जकातवाडीचे सरपंच उत्तम सणस, सामाजिक कार्यकर्ते राजेश भोसले, तंटामुक्त समिती अध्यक्ष जनार्दन भोसले, डॉ सचिन भोसले, संचालक तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक तुषांत माने, ग्रा. प. सदस्य उत्तम भोसले, संजय दौंडे, प्रकाश माने आदी उपस्थित होते. त्यांनी निवेदन दिले आणि पुरावेही सादर केले.
त्यांनी दिलेले निवेदन पुढीलप्रमाणे ताईसाहेब, आपण नेहमीच पुरोगामी विचारांची पाठराखण केली आहे. स्त्राr सन्मानासाठी आपण नेहमीच पुढाकार घेतला आहे. आमच्या सातारा जिह्याची सावित्रीबाई फुले यांचा क्रांतिकारी जिल्हा म्हणून ओळख आहे. सातारा जिह्यातील जकातवाडी ग्रामपंचायतीने विधवा पुनर्विवाह हा ठराव घेऊन विधवेशी लग्नग्न केले की ग्रामपंचायत वीस हजार रुपये अनुदान देणार असे क्रांतिकारी पाऊल 16 डिसेंबर 2018 रोजी उचलले आहे. विधवा पुनर्विवाहाचे क्रांतिकारी पाऊल उचलणारी जकातवाडी ग्रामपंचायत ही देशातील पहिली ग्रामपंचायत आहे. कोरोना काळात अनेक महिला विधवा झाल्या आहेत. अपघात, हार्टअटॅक, कॅन्सरसारखे आजार, व्यसनाधीनता इ. मुळे युवकांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामुळे ऐन तारुण्यात मुली विधवा होत आहेत. समाजात मुलींचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मुलांच्या लग्नग्नाचा सामाजिक प्रश्न गावागावात नव्याने उभा राहत आहे. आंतरजातीय लग्नग्न करणाऱयांसाठी शासन अनुदान देते त्याच धर्तीवर विधवा पुनर्विवाहास सरकारने अनुदान उपलब्ध करून दिले तर विधवांच्या विवाहांना चालना मिळेल. शिवाय ज्यांना मुले आहेत त्याविधवांच्या लग्नग्नालाही गती येईल. महात्मा फुले, पंडिता रमाबाई, न्यायमूर्ती रानडे यांच्या विचारांची विधवा पुनर्विवाह ही चळवळ महाराष्ट्रभर सुरू व्हावी. महाराष्ट्र शासनाने राज्यात जकातवाडी पॅटर्न राबवावा. यासाठी ताईसाहेब, आपण पुढाकार घेऊन विधवांच्या पुनर्विवाहाच्या चळवळीला राज्य सरकारच्या माध्यमातून बळ द्याल ही खात्री आहे, असे म्हटले आहे.