प्रतिनिधी/ सातारा
झालेल्या पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. शहरातील प्रभाग 19 मध्ये अनेकांचे नुकसान झाले आहे. ज्यांच्या घरांच्या भिंती पावसाने पडलेल्या आहेत. त्यांना शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी, अशी विनंती नगरसेवक रवी ढोणे यांनी प्रशासनाकडे केली आहे. त्यांनी प्रभाग 19 मध्ये कांबळे यांच्या घराची पावसाने भिंत पडली त्याची पाहणी करताना त्यांनी तलाठी अण्णासाहेब तारळकर यांच्याकडे विनंती केली.
यावर्षी दि. 21 व 22 रोजी झालेल्या पावसाने शहरातील प्रभाग 19 मध्ये काही जणांचे नुकसान झाले आहे. प्रभाग 19 हा डोंगर उताराचा असल्याने पावसाचे पाणी काही घरामध्ये शिरले होते. पावसाने कोणाचे नुकसान झाले की नाही याकरता नगरसेवक रवी ढोणे यांनी स्वतः तलाठी अण्णासाहेब तारळकर यांना घेवून हा भाग फिरुन पाहिला. काही नागरिकांनी त्यांना पडझड झाल्याचे सांगितले. तेव्हा रवी ढोणे यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करताना अण्णासाहेब तारळकर यांना पंचनामे करुन लवकरात लवकर तातडीची मदत द्या. येथील नागरीक हे हाताच्या पोटावर काम करुन राहणारे लोक आहेत. नुकसान भरपाई लवकर मिळाल्यास त्यांना पडझड झालेली पुन्हा सुस्थितीत करता येईल, असे त्यांनी सांगितले.