व्यापाऱयाला चालना : व्यापारी असोसिएशनतर्फे बाजार समिती बंद ठेवू
वार्ताहर / कंग्राळी खुर्द
कर्नाटक शासनाने गेल्या तीन महिन्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमधील महसूलाचे प्रमाण कमी जास्त करत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांबरोबरच व्यापारी वर्गाला याचा फटका बसला आहे. याची दखल घेत शासनाने व बाजार समितीमधील महसूल रद्द करावा आणि बाजार समितीमधील व्यापाऱयाला चालना द्यावी अशा मागण्यांचे निवेदन सोमवारी बाजार समितीमधील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष एन. एस. झंगरुचे यांच्या हस्ते प्रशासनास दिले.
प्रशासनाने पूर्वी बाजार समितीमध्ये जे व्यवहार चालतात त्यावर ग्राहकांकडून 1 टक्का कर घेण्यात येत होता. पुन्हा यामध्ये बाजार समितीमधील व्यवहाराला चालना मिळावी, शेतकऱयांना याचा फायदा व्हावा यासाठी पुन्हा महसुलात फेरफार करून तो शेकडा 0.35 टक्का करण्यात आला. त्यात पुन्हा वाढ करून तो 1 टक्का केल्याच्या निषेधार्थ कर्नाटक बाजार समितीमधील सर्व व्यवहार सोमवारी बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला. शासनाने वारंवार फेरफार केल्याने याचा फटका व्यापारी वर्गाला बसत आहे. कारण बाजार समितीमधील बहुतांश व्यवहार संगणकावर चालतो. त्यामुळे वारंवार त्यामध्ये फेरफार करणे गैरसोयीचे काम होत आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष चेतन खांडेकर, विक्रमसिंह कदम पाटील, नृसिंह पाटील, राहुल होनगेकर, दत्ता पाटील, विनायक होनगेकर, विनायक पाटील, अभिजीत मोरबाळे, माजी नगरसेवर मोहन बेळगुंदकर, विश्वास घोरपडे, गजानन घोरपडे, एस. आर. कडुकर, महादेव पाटील, राहुल देसूरकर, चंद्रकांत खानोलकर, डी. बी. पाटील, राजू जाधव, माणिक होनगेकर आदी व्यापारी उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समिती बंद
कर्नाटक शासनाने बाजारसमिती व्यवहारावरील महसुलात वाढ केल्याच्या निषेधार्थ कर्नाटकातील बाजारसमिती सोमवारी बंद ठेवून आंदोलन पुकारण्यात आले होते.
या बंदमध्ये बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा, बटाटा, रताळी, गुळ, कडधान्ये, भाजीपाला बंद ठेवून आपला निषेध नोंदविला. त्यामुळे कोटय़ावधी रुपयांचे व्यवहार थांबले होते.