जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांचे प्रतिपादन
कसबा बीड/ प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील कोगे गावात महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग व पंचायत समिती करवीर कृषी विभाग यांचे संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक जयंती व कृषी दिन संपन्न झाला. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने शेतकऱ्याचे उत्पन्न हे वाढले पाहिजे व अन्नधान्य अन्नधान्याचाही उत्पादन वाढले पाहिजे. यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती करवीर कृषी विभाग यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या मध्ये नवनवीन व शास्त्रीय पद्धतीने शेती केली पाहीजे. म्हणून 1 जुलै पासून संजीवनी अर्थात कृषी सप्ताह म्हणून साजरा करत आहोत असे सूर्यवंशी साहेब यांनी प्रस्ताविक मध्ये सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद चे अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सुरुवात करण्यात आली. यावेळी बियाण्यांची उगवण क्षमता कोणत्या प्रकारे होते ? बियाणे कशा पद्धतीने तयार केली जातात ? पिकांची उगवण क्षमता कशा पद्धतीने होते ? यादी विषयावर सविस्तर मार्गदर्शन डॉ. अशोक पिसाळ यांनी केले. माजी मुख्यमंत्री कै.वसंतरावजी नाईक यांनी देशाला अन्नधान्य तुटवडा होऊ नये व भरघोस पिके घेऊन देशाची प्रगती व्हावी. तसेच नवनवीन पिके कशी घ्यावी यासंदर्भात कृषी विभाग व शेतकरी या दोघांच्या समन्वयाने उत्पादनात वाढ व्हावी या हेतून कृषी दिन साजरा करण्याचे ठरवले. आणि आज त्यांचे हे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे, असे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
जिल्हा अधिक्षक ज्ञानेश्वर वाकुरे साहेब यांनी इतिहास व भूगोल विसरणे म्हणजे स्वतःचे अस्तित्व विसरणे अशा स्पष्ट शब्दात 1962 पासून आज आखेर शेतीमध्ये झालेल्या उत्क्रांतीचा उल्लेख केला. यावर्षी कोरोनाव्हायरस संकट असून सुद्धा देशातील शेतकऱ्यांना 4200 मेट्रिक टन खते बियाणे व औषधे कृषी विभागाच्या मार्फत पुरवली आहेत. लिंकिंग च्या बाबतीत जवळपास 73 तक्रारी आल्या होत्या त्यांचे पूर्णपणे निवारण करून पंचवीस लोकांचे परवाने रद्द केलेत जेणेकरून दुकानदार वचक बसावी व शेतकऱ्यांची सोय व्हावी. अन्नधान्य योजना, ठिबक सिंचन योजना आदी योजनां चालू असल्याचे सांगितले. कोरोना संसर्गजन्य रोगामुळे शेतकऱ्यांच्या शेतकर्यांच्या बांधावरती जाऊन मार्गदर्शन करणे ही संकल्पना अमलात आणले असल्याची आपल्या मनोगतात सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रत्येक तालुकास्तरीय मेळावे घेतले जावेत व शेती शास्त्रीय पद्धतीने करणे गरजेचे असल्याचे सांगितले. जवळपास 90 टक्के लोकांनी शेती करण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा केली आहे अशाच पद्धतीचे नववी उपक्रम कृषी विभागाकडून घेऊन आपल्या जिल्ह्य अन्नधान्य मध्ये एक नंबर राहावा असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता नावलगी यांनी केले व आभार तानाजी मोरे यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, करवीर पंचायत सभापती सौ अश्विनी धोत्रे, करवीर पंचायत माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, विभागीय कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके साहेब प्रकल्प अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे मॅडम गटविकास अधिकारी सचिन घाटगे साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी आर जी पाठक साहेब, आधी जिल्हा परिषद व पंचायत समिती समिती अधिकारी, कुंभी कारखाना संचालक पी. के .पाटील सर, सरपंच रवींद्र वेदांते, सखाराम शिवा दूध संस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील, राजाराम पतसंस्थेचे चेअरमन बळीराम चव्हाण, बाळा भागोजी दूध संस्थेचे चेअरमन कृष्णात पाटील, यशवंत बँकेचे संचालक उत्तम पाटील, ग्रामसेवक आंबेकर साहेब ,उपसरपंच विश्वास पाटील ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी वर्ग उपस्थित होता.