नागरिकांना दूषित पाणी वापरण्याची वेळ : मनपा अधिकाऱयांच्या उद्धट उत्तरामुळे संताप : विविध समस्यांमुळे नागरिक हैराण
प्रतिनिधी /बेळगाव
शास्त्री नगर परिसरातील नागरी समस्यांचे निवारण होत नसल्याने नागरिकांना जगणे मुश्कील बनले आहे. परिसरातील डेनेज वाहिनी खराब झाली असल्याने सांडपाणी कूपनलिका आणि विहिरींमध्ये पाझरत आहे. परिणामी शास्त्री नगर परिसरातील नागरिकांना दूषित पाणी वापरण्याची वेळ आली आहे. याबाबत मनपाकडे तक्रार केली असता पाण्यामुळे कोणी मरत असेल तर मरू दे आम्ही जबाबदार नाही, असे उद्धट उत्तर मिळत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
शहराचा विकास करण्यासाठी निधीची तरतूद करूनही विकासकामे राबविण्याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले असल्याने अनेक समस्यांचा सामना शास्त्राrनगर परिसरातील रहिवाशांना करावा लागत आहे. रस्त्यांची दुरवस्था, गटारींची अस्वच्छता, ड्रेनेज वाहिन्यांची दुरवस्था, कचऱयाची उचल न करणे, पिण्याच्या पाण्याचा अपुरा पुरवठा अशा विविध समस्यांमुळे शास्त्री नगर परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तिसरा क्रॉस परिसरातील ड्रेनेज वाहिनी खराब झाली असून डेनेज वाहिनी घालण्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. डेनेज वाहिनी बऱयाच वर्षांपूर्वी घालण्यात आली असल्याने पूर्णतः खराब झाली आहे. त्यामुळे डेनेजचे सांडपाणी विहिरी आणि कूपनलिकांमध्ये पाझरत आहे. परिणामी परिसरातील विहिरी व कूपनलिकांचे पाणी दूषित झाले आहे. नागरिकांना या पाण्याचा वापर करावा लागत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. याबाबतची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली असता उद्धट उत्तरे मिळत आहेत.
नागरिकांची निव्वळ दिशाभूल
शास्त्राrनगर परिसरातील डेनेज वाहिनी घालण्यासाठी अमृत योजनेंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली असून काही भागात ड्रेनेज वाहिनी घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परिसरातील गटारींची स्वच्छता क्यवस्थित करण्यात येत नसल्याने काही ठिकाणी गटारी तुंबल्या असून काही गटारी खराब झाल्याने बांधकाम करण्याची गरज आहे. याकडेही महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे. घरामध्ये जमा होणारा कचरा महापालिकेच्या स्वच्छता कामगारांकडे देण्याचे आवाहन करण्यात येते. मात्र, बहुतांश वेळा स्वच्छता कामगार कचरा घेण्यासाठी येत नसल्याने काही नागरिक घरातील कचरा नाल्यात टाकत आहेत. नाल्याची स्वच्छता करण्यात येते असाही दावा महापालिकेच्यावतीने करण्यात येतो. याकरिता लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात येतो. पण नाल्यामध्ये साचलेला कचरा व नाल्याच्या काठावर उगवलेले गवत, झाडेझुडुपे पाहता नाला स्वच्छता मोहीम निव्वळ दिशाभूल असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. शास्त्राrनगरमधून दोन नाले वाहत असून त्यांची स्वच्छता व्यवस्थित केली जात नसल्याने सांडपाणी पाझरून विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. विशेषतः डेनेज वाहिन्यांमुळे विहिरी व कूपनलिका खराब झाल्या आहेत. परिसरातील रहिवाशांना याच पाण्याचा वापर करावा लागत असल्याने आरोग्याच्या समस्या आणि त्वचा रोगाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
मनपा अधिकाऱयांचा बेजबाबदारपणा
ड्रेनेज वाहिनी खराब झाल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही, ड्रेनेज वाहिन्या आणि चेंबर खराब झाले असल्याने सांडपाणी पाझरून विहिरी-कूपनलिकांचे पाणी दूषित झाले आहे. यामुळे लहान मुले व वृद्ध आजारी झाल्यास जबाबदार कोण? सध्या कोरोनामुळे रुग्णालयात दाखल करणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनही याची दखल घेण्यात आली नसल्याने दूषित पाणी वापरण्याची वेळ आली आहे. याबाबत एका अधिकाऱयाकडे तक्रार केली असता दूषित पाण्यामुळे कोण मरत असेल तर मरू देत, आम्ही जबाबदार नाही, असे उद्धट उत्तर मनपाचे अधिकारी देत असल्याचा आरोप येथील रहिवासी रोहित देशपांडे यांनी केला. जर समस्येचे निवारण न झाल्यास आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला.
आश्वासनाकडे दुर्लक्षाचा फटका
शास्त्राrनगर परिसरात असंख्य समस्या असून कितीही तक्रारी केल्या तरी याची दखल घेतली जात नाही. परिणामी नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. डेनेज वाहिन्या घालण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱयांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याने समस्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे शीतल मुळीक यांनी सांगितले.
समस्यांचे त्वरित निवारण करा
पिण्याचे पाणी चार-पाच दिवसाआड सोडण्यात येत आहे, पण फक्त दोन तास पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने मुबलक पाणी मिळत नाही. यामुळे घरासमोरील विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याचा वापर दैनंदिन कामासाठी करावा लागतो. पण हे पाणी दूषित झाले असल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. सांडपाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मालन कुंभार यांनी केली.