प्रतिनिधी/शाहुवाडी
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनाने पुणे, मुंबई, यासह अन्य ठिकाणावरून गावी आलेल्या सुमारे १५ हजार नागरीकांपैकी आठ हजार नागरीकांचा होमक्वारंटाईन कालावधी संपला असून तीन हजार लोकांचा बाकी राहला असल्यांची माहिती तालुका वैद्यकी अधिकारी एच आर निरंकारी यानी दिली.
उचत पैकी लहिन गल्लीत आढळलेल्या तीन कोरोनाग्रस्त रूग्णामुळे मलकापूर, उचत, परळे, येळाणे ही चार गावे प्रशासनाने प्रथम सील केली. त्यानंतर त्यांची आई व चुलत भाऊ सापडल्याने गेल्या आठ दिवसापासून रिक्षा चालकांने संचार केलेल्या १४ गावाच्या सीमा तर मलकापूर शहरातील प्रभाग सील करून संपूर्ण व्यवहार बंद ठेवले आहेत. एकूणच तालुक्यात तीन कोरोना रूग्ण सापडल्याने सर्वत्र कडक संचार बंदी असून मलकापूर नगरपरीषदेन ही शहरात प्रभागशिल करून दक्षता घेतली आहे प्रत्येकाची कसून चौकशी सुरू आहे.
शाहुवाडी तालुक्याला दिलासा
दरम्यान तालुक्यात सापडलेल्या पहील्या कोरोना पॉजीटीव्ह रूग्णाचा दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आला असून आता पर्यंत एकुण २१९ रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. नागरीकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये संचारबंदीच काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान ही तहसिलदार गुरू बिराजदार, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे , सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी केले आहे