भारत भोसले यांच्या मागणीची दखल
प्रतिनिधी/ सातारा
गेल्या अनेक महिन्यांपासून शाहूपुरी चौकाच्या परिसरातील रस्त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा करणाऱया मोठया जलवाहिन्यांमधून पाणी गळती सुरु होती. याबाबत शाहूपुरी ग्रामविकास आघाडीतर्फे भारत भोसले यांनी दोन, तीन वेळा निवेदने दिल्यानंतर अखेर बुधवारपासून प्राधिकरणाकडून पाणी गळती काढण्याच्या कामास आरंभ करण्यात आला आहे.
शाहूपुरी चौक परिसरात माळवाडीकडे जाणारा रस्ता तसेच रांगोळे कॉलनीकडे जाणा-या रस्त्यावर गेले अनेक महिन्यांपासून पाणी गळती होत सुरु आहे. तसेच रांगोळे कॉलनीकडे जाणाऱया रस्त्यावर असणारी गळती ही मोठय़ा प्रमाणावर आहे. रस्त्याखालून वाहणारे पाणी हे जादा प्रमाणात वाहत असल्याने त्याचा परिणाम दैनंदिन होणाऱया पाणी पुरवठय़ावर होत आहे.
याबाबत भारत भोसले यांनी दोन वेळा निवेदने देवून शाहूपुरीतील गळती काढण्याची मागणी प्राधिकरणाच्या अधिकाऱयांची समक्ष भेट घेवून केली होती. तसेच पाणी गळती न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर तरीही त्यानंतर तब्बल 15 दिवसांनी प्राधिकरणाने त्याची दखल घेतली. बुधवारपासून जेसीबीसह कामगारांच्या सहाय्याने गळती काढण्याच्या कामास आरंभ झाला आहे.