प्रतिनिधी / शाहुवाडी
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी. अटक केलेल्या आरोपीला कोर्टात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना संबंधित आरोपीने पोलिसांवरच हल्ला करून धूम ठोकली होती या आरोपीस अवघ्या तीन तासातच करंजोशी गावच्या हद्दीत जेरबंद करण्यात शाहूवाडी पोलिसांना यश आले बैतूल शेख असे त्या आरोपीचे नाव आहे.
पोलीसतून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार 2 मार्च रोजी रस्त्यात झालेल्या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी बैतूल शेख वय 20 व आलम अब्दुल रहीम शेख २८ मुळ राहणार टेकोली पण सध्या ते मुंबई येथे कामास आहेत. हे दोन्ही आरोपी शाहूवाडी पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी शासकीय कामात अडथळा करण्यासारखे कृत्य करून ठाणे अंमलदार यांना शिवीगाळ केली. त्याच बरोबर मलकापूर ग्रामीण रुग्णालयातील आईसीयू सेंटरमधील मशीनची ही नासधुस करून शासकीय मालमत्तेच 27 हजार रुपयाचे मशीन चे नुकसान केले होते.
या प्रकरणी त्यांच्यावर शाहूवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला होता. याबाबत त्यांना शाहुवाडी मलकापूर च्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यासाठी घेऊन जात असताना ठेच लागण्याचे निमित्त करून बैथुल शेख हा खाली पडला या संधीचा फायदा घेत त्यांने बंदोबस्तास असलेले पो. हे. चिंतामणी बांबळे यांच्या डोक्यात पडलेल्या फरशीचा तुकडा घालून त्यांना जखमी केले. व दोन्ही आरोपींनी तिथून धूम ठोकली मात्र पोलिसांनी व नागरिकांनी तात्काळ आलम शेख यास अटक केली मात्र बैथुल शेख याने पोबारा केल्याने सर्वांचीच धावपळ उडाली होती.
सर्वांचीच धावपळ उडाली होती
सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस उप अधीक्षक आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख , पोलीस उपनिरीक्षक प्रियांका सराटे व कळे कोडोली, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस कर्मचारी यांनी शोध मोहीम राबवली तसेच शाहूवाडी परिसरातील ग्रामस्थ यांनी शोध मोहीम राबवली होती सायंकाळच्या दरम्यान करंजोशी गावच्या हद्दीत बैथुल शेख आला असल्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी शाहूवाडी पोलिसांच्या सह ग्रामस्थांनी पकडून पोलिसांनी ताब्यात घेतले.
शाहुवाडी पोलिसांचे अभिनंदन
संबंधित आरोपीला जेरबंद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या शाहूवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन करण्याचे यावेळी आर आर पाटील यांनी सूचना केली दरम्यान संबंधित आरोपी हे मुंबईला राहणारे असून त्यांच्यावर मुंबई परिसरातही अनेक गुन्हे दाखल झाल्याने ते सराईत गुन्हेगार असल्याचे हे बोलले जात आहे.