प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूरातून सांगली आणि सातारा जिह्यात जाणाऱया कामगारांना 1 ते 31 जुलै या महिन्याच्या कालावधीसाठी दैनंदिन पास दिले जात आहेत. त्यासाठी विशेष अधिकारी प्राधिकृत केले आहेत. त्यानुसार उद्योगातील कामगार, शासकीय, निशासकीय अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक, माध्यमिक शाळांसह महाविद्यालयीन शिक्षक आणि बँक कर्मचाऱयांनी संबंधित अधिकाऱयांकडून पास घेतला आहे. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसारच हे पास घेतले असले तरी शाहूवाडी पोलीसांकडून मात्र कर्मचाऱयांची अडवणूक केली जात आहे. कोल्हापूर हद्दीतील कोकरूड चेकपोस्ट नाक्यावर नियुक्त पोलिसांकडून तहसीलदारांची सही असलेल्या पासची मागणी केली जात असून प्रवाशी कर्मचाऱयांसोबत हुज्जत घातली जात आहे. त्यामुळे पोलीसांना जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाचे वावडे आहे की त्याबाबत माहितीच नाही असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
कोल्हापूर औद्योगिक क्षेत्रातील विविध उद्योग व इतर खासगी कार्यालयासाठी जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक कार्यालयाकडून पास दिले जात आहेत. सर्व शासकीय विभाग व बँक कर्मचाऱयांना करवीर, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा आणि शाहूवाडी तहसीलदार कार्यालयातून पास देण्याचे काम सुरु आहे. तर खासगी शाळा, प्राथमिक शाळा, हायस्कूल, महाविद्यालयातील शिक्षकांसाठी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती करवीर, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी यांच्यामार्फत पास दिले जात आहेत. 2 जुलैपासून हे पास घेऊन कोकरुडमार्गे सांगली आणि सातारा जिह्यात जाणाऱया कर्मचाऱयांना कोकरुड चेकपोस्ट नाक्यावर अडवले जात आहे. विशेषतः शिक्षकांकडे गटशिक्षणाधिकाऱयांचा पास असतानादेखील त्यांच्याकडे तहसीलदारांच्या पासची मागणी केली जात आहे. यावेळी जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसारच हे पास घेतले असून ते वैध असल्याचे सांगूनदेखील शिक्षकांची अडवणूक केली जात आहे. विशेष बाब म्हणजे शाहूवाडी पोलिसातील वरिष्ठ अधिकारीच जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाबाबत अनभिज्ञ असून तहसीलदारांचा पास असल्याशिवाय सोडू नये अशी त्यांनी चेकपोस्ट नाक्यावरील कर्मचाऱयांना सूचना दिली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱया कर्मचाऱयांची ससेहोलपट सुरु आहे.