सरपंच रेश्मा शिंगाडे
दीपकराव तंडेबडवे / शिखरशिंगणापूर :
माण तालुक्यातील येळेवाडीच्या सोपान आबाजी महानवर यांची कन्या तर ठोबंरेवडीच्या बाळासाहेब शिंगाडे यांच्या सुनबाईंची रेश्मा दादा शिंगाडे. महिला सरपंच म्हणून म्हणून आज शिखर शिंगणापूरचा कारभार पहात आहेत. शिंगणापूरच्या विकासासाठी सरपंच या नात्याने त्या परिश्रम घेत आहे. शिंगणापूरच्या विकासाचा ध्यास त्यांनी मनी बाळगला आहे.
संत गाडगेबाबा अनाथ आश्रमशाळा चालविणाऱ्या शिवाजीराव महानवर यांची पुतणी असल्याने सामाजिक, विधायक कार्याचे सुसंस्कार बालपणीच लाभले. तर सासरे बाळासाहेब यांनी ग्रामपंचायत सदस्य, अन् सहकारातील सेवा सोसायटी चेअरमन म्हणून पद भूषवली आहेत. त्यामुळे राजकीय ही वारसा लाभला आहे. पती दादा शिंगाडे यांना शिंगणापूरचे माजी सरपंच राजाराम बोराटे यांचे निकटवर्ती म्हणूनच ओळखतात. दादा शिंगाडे यांनी ही शिंगणापूर मोही पतसंस्था संचालक, तर सेवासोसायटी चेअरमन म्हणून सहकारात काम केले आहे. नव्यानेच झालेल्या शिंगणापूर ग्रामपंचयत निवडणुकीत जलनायक आमदार जयकुमार गोरेगटाची सत्ता आली. पार्टीप्रमुख राजाराम बोराटे व आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी शिंगणापूर गावच्या कारभाराची धुरा संभाळण्यासाठी माझ्यावर विश्वास व्यक्त केला. त्यामुळे बिनविरोध सरपंच पदाची धुरा अंगावर पडली. सामाजिक कार्यासाठी जनसेवेची संधी उपलब्ध झाल्याने समर्थपणे सरपंचपद सांभाळत आहे. समस्त गावकऱयांच्या विश्वासास पात्र राहून ‘शिंगणापूरचा विकास, हाच एक ध्यास’ हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर असल्याची भावना सौ. रेश्मा शिंगाडे यांनी आमच्या प्रतिनिधींकडे व्यक्त केली. मूलभूत सोयी सुविधांपासून वाडी, वस्ती, अन् शिंगणापूरचा एक ही नागरिक वंचित राहणार नाही. याची खबरदारी शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण घेणार आहोत.
अखिल महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी प्रशस्त रस्ते, एकेरी वाहतूक, सुशोभीकरण, वृक्षारोपण, आरोग्यसुविधा याकडे आपले विशेष लक्ष आहे. सर्वांच्या मार्गदर्शनातून भविष्यात शिंगणापूरचा कायापालट करण्याचा मानस सौ. रेश्मा शिंगाडे यांनी व्यक्त केला. तसेच शिंगणापूर गावात शासनाच्या विविध योजना तसेच सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी सरपंच या नात्याने रेश्माताईंचा नेहमीच प्रयत्न असतो.
महिलांनी अंगच्या गुणांना वाव द्यावा
आजच्या धकाधकीच्या जीवनात स्त्री आपल्या कुटुंबासाठी तारेवरची कसरत असते. नोकरी, व्यवसाय सांभाळत घरातील काम करत असते. तसेच बाकी स्त्रिया या शेती तसेच घरातील काम मुलांची जबाबदारी पेलत असतात. अशा
सर्व महिलांना मी एकच सांगू इच्छिते की, आपण ही तारेवरची कसरत असताना आपल्या घरातील व्यक्तींच्या आरोग्याबरोबर आपल्या स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. आपले निर्णय आपण स्वतः घ्यावेत. त्याचबरोबर गावच्या विकासकामांसाठी वेळ द्यावा. आपल्या अंगच्या कलागुणांना वाव द्यावा.
-रेश्मा दादा शिंगाडे (सरपंच, शिखर शिंगणापूर )