वार्ताहर/ शिखरशिंगणापूर
अखिल महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून शिखर शिंगणापूर ओळखले जाते. सध्या शिंगणापूर वार्षिक चैत्री यात्रा सुरू आहे.त्या अनुषंगाने माण खटाव प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी शिंगणापूर यात्रानिधी बाबत जिल्हा परिषद सातारा येथे समक्ष भेटून पाठपुरावा केला.प्रांताधिकारी यांनी तीर्थक्षेत्र विकासा बाबत कर्तव्यदक्षता दाखवून पाठपुरावा केला.त्यांचे समवेत,सामाजिक कार्यकर्ते, कृषिमित्र,जेष्टपत्रकार, विश्वंभर बाबर होते. शिंगणापूर ग्रामपंचायत प्रशासनाने ठरावाद्वारे प्रांताधिकारी यांचे अभिनंदन केले.
माणखटाव प्रांताधिकारी यांचे अध्यक्षतेखाली शिंगणापूर येथे आढावा बैठक झाली.या बैठकीत कावडी धारक, यांचे स ह अनेक भाविकांनी गैरसोयीचा पाढा वाचला.शिंगणापूर ग्रामपंचायतीने शासन दरबाराचा निधी मिळत नसल्याचे कथन केले. यात्रेकरू संख्येत वाढ झाली मात्र त्या मानाने अपुरा निधी आहे. 1999पासून फक्त 2 लाख 70 हजार निधी येतो. शिंगणापूर येथे येणाया तमाम भाविक,यात्रेकरू च्या गैरसोयी दूर करण्या मध्ये त्या मानाने अडचण निर्माण होत आहे. हे निदर्शनास येताच स्वतः प्रांताधिकारी सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषद सातारा येथील तीर्थक्षेत्र व ग्रामीण विकास अभियंता एस एस शिंदे यांची भेट घेऊन सुमारे 13 लाख मंजुरी प्रस्ताव स्वतः दाखल केला. यावेळी संमधीत अभियंता शिंदे यांनी शासन दरबारी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून भरीव निधी बाबतचे आश्वासन दिले.
ङशिंगणापूर ग्रामपंचायतीने ठरावा द्वारे प्रांताधिकारी यांचे केले अभिनंदनङ
माण खटाव प्रांताधिकारी विभागातील पुसेगाव,औन्ध, गोंदवले,शिंगणापूर तीर्थक्षेत्र विकासाबाबत ठोस उपाय योजना राबवित आहेत. भाविकांच्या सोयीसुविधा पुरविण्या कडे प्रांताधिकारी यांचे विशेष लक्ष आहे. हरित वसुंधरा माध्यमातून शैलेश सूर्यवंशी 244 गावांचा विकास साधत आहे.प्रांताधिकारी यांच्या या कर्तव्यदक्षते बाबत शिंगणापूर ग्रामपंचायतीने ठराव घेऊन अभिनंदन केले आहे. माजी सरपंच राजाराम बोराटे,सरपंच रेश्मा शिंगाडे, उपसरपंच शशिकांत भोसले, यात्रा कमिटी अध्यक्ष डॉ अतुल बंदुके, राजेंद्र पिसे, ग्रामसेवक चव्हाण, जेष्ठ लिपिक दत्ता तोडकर,पो पाटील संतोष बोराटे,जेष्टपत्रकार दीपकराव तंडेबडवे या विशेष अभिनंदन बैठकीस उपस्थित होते.