आम आदमी पक्षाची मागणी
प्रतिनिधी /पणजी
भाजप सरकारने सरकराने खाते वाटप केले असले तरी, शिक्षण व विज खात्यासारखी महत्वाची खाती अद्याप कुणाला दिलेली नाही. किमान शिक्षणाचा गंध असलेल्या मंत्र्याला शिक्षण खाते द्यावे अशी मागणी आपने केली आहे. कारण या अगोदर भजपाने शिक्षणाचा गंधही नसलेल्या मंत्र्याला शिक्षण खाते देऊन गोव्यातील शिक्षण पध्दतीची बट्टयाबोळा केला असल्याचे गोमंतकीयांनी पाहिले आहे. केवळ स्वतःचा फायदा करुन घेण्यासाठी हपापलेले भाजपचे मंत्री मोठी खाती मिळविण्यासाठी तळमळत असल्याचे दिसून आले आहे. असेही त्यांनी सांगितले.
काल सोमवारी आपने पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपचे राजदीप नायक बोलत होते त्यांनी वरील माहिती दिली आहे. यावेळी त्यांच्या सोबत वाल्मीकी नाईक उपस्थित होते. भाजपच्या मंत्र्यांनी मोठी खाती हवीत केवळ स्वतःची तीजोरी भरण्यासाठी जनतेच्या विकासासाठी नव्हे अशी टीकाही नायक यांनी केली. विधान सभा निवडणूक होऊन भाजप सरकार सत्तेतही आले मात्र महिना झाला तरी एक तरी मंत्र्यांच्या शपतविधीला उशीर का झाला. नंतर शपतविधी होऊनही खातेवाटपाला उशीर का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
कोणत्या खात्यात किती फायदा मिळेल याचा हिशोब करण्यात मंत्री व्यस्थ होते म्हणूनच मोठा फायदा मिळणारे खाते मिळविण्यासाठी प्रत्येक मंत्री धडपडत होता. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांना खूर्ची संभाळण्यासाठी प्रत्येक मंत्र्याच्या मागणीवर विचार करणे मुख्यमंत्र्यांना भाग होते त्यातच खाते वाटपाला उशीर झाला. मात्र या सगळ्या प्रकारात जनतेला कीती नुकसान झाले याचा भाजपने विचार केलाच नाही. निवडणूक होऊनही दोन महिने उलटले तरी जनतेसाठी सरकार उपलब्ध नव्हते. असे वाल्मीकी नाईक म्हणाले.