प्रतिनिधी/ धारबांदोडा
किसान सभा वाकीकुळण शिगांव या संघटनेशी निगडीत शेतकऱयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व कृषीविषयक मार्गदर्शन करण्यासाठी धारबांदोडा कृषी विभाग, जलस्रोत विभाग व शेतकरी यांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. शिगांव येथील रंगाई शांतादुर्गा देवस्थानच्या सभामंडपात झालेल्या या बैठकीत पिकांना लागलेल्या किटकांवर उपायोजना आखण्याच्या मुद्दय़ावर चर्चा झाली.
धारबांदोडा कृषी विभागीय अधिकारी नागेश कोमरपंत, सहाय्यक अधिकारी कृष्णनाथ गांवस, किरण जोशी, जलस्रोत खात्याचे अभियंते मोहन रायकर, कनिष्ठ अभियंते श्रीनाथ, किसान सभा वाकीकुळण सभेचे अध्यक्ष नरेश शिगांवकर व इतर पदाधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.
वाकीकुळण येथील शेतीला बाम हा किटक लागल्याने पिकांचे साधारण 20 टक्के नुकसान होणार आहे. ही नुकसानीची भरून काढण्यासाठी हळसांडय़ाची लागवड करण्याचा सल्ला नागेश कोमरपंत यांनी दिला. ज्या शेतकऱयांकडे कृषी कार्ड नाही, त्यांना कृषी कार्ड देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शेतकऱयांनी कोम्युनिटी फार्मिंग करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.
वाकीकुळण येथील शेतकऱयांना पाणी पुरवठा करण्यासाठी जो पाणी प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याला वीज जोडणी लवकरच करण्यात येणार असून त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती अभियंते मोहन रायकर यांनी दिली. शिवाय या प्रकल्पासाठी मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी अंदाजे रु. 4 कोटी 64 लाख खर्चून बंधारा बांधण्याची योजना आहे, असेही त्यांनी सांगितले. रिटणीकडील ओहोळासाठी तात्काळ रु. 5 लाखाची तरतूद करण्यात आल्याचेही ते म्हणाले. जलस्रोत खात्याच्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली.
कृष्णनाथ गावस यांनी किटक व शेतीला लागणाऱया रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना सांगितल्या. वाकीकुळण येथे दुबार शेती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.