जिल्हात अनेक ठिकाणी शिडकावा
प्रतिनिधी/ सातारा/कुडाळ
दुपारी चारपासून ढगाळ वातावरण झाले होते. हळूहळू वाराही लुफ्त होत गेला आणि वीजांचा कडकडाट सुरु झाला होता. पाच वाजण्यास सुमारास सातारा शहरासह परिसरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. तर पाचगणीमध्ये हाच अवकाळी पाऊस मुसळधारपणे स्वच्छंद कोसळला. अवकाळी पावसाने पाचगणी परिसरातील स्ट्रॉबेरी पिकाला फटका बसला तर पाचगणी शहर जलमय झाले होते. दरम्यान, जिल्हय़ात माण, खटाव, फलटण सोडल्यास पश्चिम भागात पावसाचा शिडकावा झाला.
सातारा शहरासह परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या दरम्या अचानक तुरळक पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासुनच वातावरणात कमालीचा बदल हा जाणवतच होता. त्यातच कडक उन्हाच्या झळा गायब होऊन दोन दिवस ढगाळ वातावरण होते. तसेच शनिवार रविवार कडक लॉकडाऊन असल्याने नागरिकांची साहित्य खरेदीकरण्याकरीता गर्दी होती, अचनाक पडलेल्या तुरळक पावसाने मात्र सर्वांचीच तारांबळ उडाली.
विशेष म्हणजे शहरातील मिर्ची विक्रेते, तसेच भाजी विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. ग्रामीण भागात तर तुरळक पावसाबरोबरच वादळ ही होते. त्यामुळे याचा परिणाम शेतीपिकांवर ही झाला. मुख्य म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱयांवर याचा अधिक परिणाम झाला. तसेच आंबा उत्पादनावर ही याचा परिणाम झाला.
अचानक पडलेल्या या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला होता. वेधशाळेने आधिच ढगाळ वातावरण व तुरळक पावसाचा अंदाज आधीच वर्तविला होता. तसेच अचानक पडलेल्या या पावसामुळे नागरिकांमध्ये चांगलेच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच कोरोना त्यातच अशा कमालीच्या वातावण बदलामुळे याचा आरोग्यावर परिणाम होईल सर्दी, खोकला सारख्या आजारांना निमंत्रण मिळेल त्यामुळे उपचार घेण्याकरीता पुन्हा दवाखान्याच्या वाऱया कराव्या लागतील.
पाचगणी परिसर झाला जलमय
जागतिक पर्यटन स्थळ थंड हवेचे ठिकाण पाचगणी येथे मुसळधार पाऊस अचानकच दुपारी वातावरणात बदल होऊन पाचगणी येथे चारच्या सुमारास मुसळधार पावसाने पाचगणी जलमय करून टाकली सोसाटय़ाचा वारा विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पाचगणी परिसरात धुवाधार पाऊस झाला यामध्ये स्ट्रॉबेरीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान देखील झाला असल्याची माहिती समोर येत आहे. संपूर्ण शहर परिसरामध्ये नाले तुडुंब वाहू लागले होते रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. गारांचा आणि मुसळधार पाऊस यामुळे काही वेळातच पाचगणीचे वातावरण पूर्णतः थंड झाले होते. या अवकाळी पावसाने पाचगणीचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.