मुंबई
सरकार शिपिंग कॉपोरेशन ऑफ इंडियामधील आपला संपूर्ण वाटा विकणार असल्याचे समजते. लंडनमधील फोरसाईट ग्रुपने हिस्सा घेण्यासाठी आपली बोली लावली असल्याचे सांगण्यात येते. सरकार शिपिंग कॉर्पोरेशनमधील व्यवस्थापन नियंत्रणाची जबाबदारी देण्याचा विचार करते आहे. या अंतर्गत आपली संपूर्ण 63 टक्के हिस्सेदारी सरकारकडून विक्रीला काढली जात आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेत अनेकांनी सामील होण्यासाठी इच्छा दर्शवली आहे. या खासगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये एस्सार ग्रुप आणि अदानी समूह यांनी मात्र बोली लावली नसल्याचे सांगण्यात येते. मागच्या नोव्हेंबरमध्ये शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये गुंतवणुकीसाठी मंत्रीमंडळाने परवानगी दिली होती.