यात्रेचा दुसरा दिवस
कोल्हापूर/प्रतिनिधी
पूरग्रस्त शेतकरी, कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जलसमाधी पदयात्रेला दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी ९ वाजता शिये येथून सुरुवात झाली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम पाटील आदी प्रमुख पदाधिकारी हे मौजे शिये (ता.करवीर) येथील छ.शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येऊन आक्रोश पदयात्रेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली आहे.
जिल्यातील प्रयाग चिखली येथील दत्त मंदिरात अभिषेक घालून नदीच्या संगमापासून पदयात्रेला मंगळवारी सुरुवात झाली होती. ५ सप्टेंबर रोजी ही पदयात्रा शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे पोहोचणार आहे . त्या दिवशी सर्व शेतकऱ्यांसह राजू शेट्टी जलसमाधी घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.