शिराळा / वार्ताहर
शिराळा येथे दोन बिबट्यांच्या हल्ल्यात सहा शेळ्या मेंढ्या ठार तर सहा शेळ्या मेंढ्या जखमी झाली आहेत. शिराळा शहरानजीकच एका महिन्यात दुसरी घटना शेतकरी व नागरीकांच्या मध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. खेड (ता. शिराळा) येथील सचिन सदाशिव माने, चंद्रकांत भिमराव वगरे, शंकर बापू कोळेकर, जगन्नाथ पांडुरंग शिरतोडे याच्या मेंढराच्या कळपावर वर बाबट्याचा हल्ला.
यावेळी वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक हणमंत पाटील, क्षेत्र सहायक बाबासाहेब गायकवाड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून पाहणी दिली.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, सुमारे सडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. शिवाजीराव खंडागळे यांच्या शेतात शेळ्या मेंढरांचा कळप बसवला होता. यावेळी इतर मेंढर दिवसभर इतर ठिकाणी चरावयास नेली होती. यावेळी काही मेंढरे चारा टाकून तळावर लोखंडी जाळीच्या डाली खाली झाकून ठेवली होती. त्यामुळे साडे सहा वाजण्याच्या सुमारास मेंढपाळ चंद्रकांत वगरे व सचिन माने हे दोघे मेंढ्या बसवलेल्या ठिकाणी परत आली. यावेळी दोन बिबटे दोन डाली जवळ शेळ्या मेंढ्यावर हल्ला करत असल्याचे या दोघांनी पाहिले व भितीने मोठमोठ्याने आरडाओरडा केला. यावेळी बिबट्यांनी शेळ्या मेंढ्याना तिथंच सोडून पळ काढला. यावेळी सहा शेळ्या व मेंढ्या मृत पावलेल्या होत्या तर सहा मेंढ्या गंभीर जखमी होत्या. या जखमी मध्ये अनेक शेळ्या मेंढ्याचे कानंच कापून नेले होते. तर अनेक शेळ्या मेंढ्याची अवस्था अतिशय दैनिय होती. यावर शिराळा पशुवैद्यकीय अधिकारी त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते.
शिराळा शहराच्या हाकेच्या अंतरावर शेळ्या मेंढ्यावर महिन्यांत हि दुसरी घटना घडल्याने नागरीकांच्या व शेतकऱ्यांच्या मध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. कारण गेल्या महिन्यात आठ डिसेंबर रोजी कापरी (ता. शिराळा) येथे सिध्देश्वर मंदिर परिसरातील पाझर तलावा जवळील शेतात खतासाठीे बसवलेल्या मेंढ्यांच्या लहान पिल्लांवर बिबट्याने हल्ला केला होता. श्रीकांत जयसिंग पाटील याचे पाझर तलावाजवळ कुरणाची टेकी नावाच्या शिवारात शेत आहे. या शेतामध्ये खतासाठी मेंढ्या बसवल्या होत्या.
यावेळी मेंढपाळ मोठ्या मेंढ्या घेऊन शिवारात चरण्यासाठी घेऊन गेले होते तर लहान पिल्ले शेतातच तारेचे तात्पुरते संरक्षक कुंपन बनवून त्यामध्ये ठेवली होती. त्यांच्या राखणीसाठी मेंढ्यांचे मालक सुभाष तुकाराम तांदळे .रा रेड (ता. शिराळा) हे दिवसभर थांबले होते. ते सायंकाळी ६.३० वाजता उजेडाबरोबर जेवण घेऊन येण्यासाठी रेड या गावाकडे गेले होते. नेमक्या या संधीचा फायदा घेऊन शेजारच्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने घेतला व संरक्षक तारेच्या कुंपनावरून उडी मारून पिल्लांवर हल्ला केला. या झटापटीत मेंढ्यांचा आवाज एकुन शेतमालक श्रीकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर सदर प्रकार पाहून आरडाओरडा केल्यावर बिबट्या पळुन गेला होता .
या हल्ल्यात हि यावेळी २० पिल्ले मृत पावली आहेत. तर ४ पिल्ले बिबट्याने ऊसात पळवुन नेली होती. तर शेळीची ७ पिल्ले जखमी झाली होती. तर विज वितरण कंपनीच्या नियमानुसार शेती पंपांना रात्रीच लाईट मिळते त्यामुळे शेतात शेती पिकांसाठी रात्री अपरात्री गोरगरिब शेतकऱ्यांना शेतात पिकांना पाणी देण्यासाठी रात्रभर एन थंडीत पिकांना पाणी पाजण्यासाठी धडपडावे लागत आहे अशा शेतकऱ्यांमध्ये कमालीच भिती निर्माण झाले आहे.