शिरोळ / प्रतिनिधी
केंद्र शासनाने कामगार व शेतकरी विरोधी केलेले कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी शिरोळ तालुका काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी दोन्ही विद्ययके रद्द करा या मागणीचे निवेदन तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांना देण्यात आले. दरम्यान, यावेळी उत्तरप्रदेश सरकारचाही निषेध व्यक्त करण्यात आला.
काँग्रेसचे नेते, दत्त उद्योग समुहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. केंद्र शासनाने कृषी विधेयकाचे रुपांतर कायद्यात करुन देशातील ९० टक्के शेतकºयांना गुलामीत ढकलले आहे. कायदा करुन संपूर्ण शेती भांडवलदार व व्यापाºयांना खुली केली आहे. या दोन्ही कायद्यांना आमचा विरोध असून केंद्र शासनाने ही विधेयके रद्द करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, शेखर पाटील, रणजित पाटील, संजय पाटील-कोथळीकर, मुसा डांगे, तातोबा पाटील, महेश परीट, शितल उपाध्ये यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.