भर पावसातही हजारो लोक सहभागी आंदोलन सुरू
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुका पुरग्रस्त अन्याय निवारण समितीच्यावतीने विविध३० मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाद्वारे देण्यात आले. या मोर्चामध्ये तालुक्यातील सुमारे ४३ गावातील हजारो पुरग्रस्त महिला, ग्रामस्थ सहभागी झाले होते. हा मोर्चा छत्रपती शिवाजी तख्त ते तहसील कार्यालय दरम्यान काढण्यात आला. भर पावसात हजारो लोक मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी काही वृद्ध महिला सहभागी झाल्या होत्या. तालुक्यातील पूरग्रस्त भागातून आलेल्या महिलांची संख्या लक्षनीय होती.
आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा. शिरोळ तालुका ओला दुष्काळ जाहीर करा. तातडीचे दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे. या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
नुकतेच महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील सुमारे ४३ गावांना महापुराने वेढले होते. पंधरा दिवस उलटूनही शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. शिवाय, महापुराबाबत कोणतेच नियोजन राज्य शासनाकडून झाले नसल्याच्या निषेधार्थ मंगळवार (दि. १७) रोजी संतप्त झालेल्या शिरोळ तालुक्यातील पुरबाधित नागरिकांनी हा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये कुरुंदवाड हेरवाड तेरवाड शिरोळ खिद्रापूर राजापूर राजापूर वाडी नरसिंह वाडी आलास गुना गुना गणेशवाडी कनवाड कुटवाड यांसह चाळीस गावातील पूरग्रस्त नागरिक सहभागी झाले होते.