प्रतिनिधी / जयसिंगपूर/यड्राव
सीमा लढय़ातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गेलेले महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी धक्काबुक्की करून अटक केली. याच्या निषेधार्थ शिरोळ तालुक्मयात संतप्त भावना उमटल्या. यावेळी नागरिकांनी ठिकठिकाणी रास्तारोको करून या घटनेचा निषेध केला.
कर्नाटक-महाराष्ट्र लढय़ात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना दरवषी 17 जानेवारी रोजी बेळगाव येथील हुतात्मा चौकात अभिवादन केले जाते. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील नेते येऊ नयेत, यासाठी शुक्रवारी पुणे-बेंगलोर महामार्गावर कर्नाटक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. त्यामुळे राज्यमंत्री यड्रावकर यांनी त्यांना चकवा देऊन बेळगाव येथील हुतात्मा चौकात आले. ही बातमी पोलिसांना समजताच अभिवादन सुरू असताना पोलीस त्या ठिकाणी आले आणि राज्यमंत्री यड्रावकर यांना मज्जाव करून धक्काबुक्की करून अटक केली. या घटनेचे वृत्त शिरोळ तालुक्मयात पसरताच सर्वत्र संतापाची तीव्र लाट पसरली. अनेक ठिकाणी रास्तारोको, निषेध फेऱया काढण्यात आल्या.
जयसिंगपूर येथील क्रांती चौकामध्ये यड्रावकर समर्थकांनी रास्तारोको करून कर्नाटक शासनाचा निषेध नोंदवला. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास रोखून धरण्यात आली. यावेळी नगरसेवक राहुल बंडगर, महेश कलकुटगी, उदय खाडे, बजरंग खामकर, गणेश गायकवाड, अर्जुन देशमुख, संभाजी कोळी, राहुल पाटील, प्रकाश पवार, अमर पाटील आदी कार्यकर्त्यांनी कर्नाटक शासनाचा धिक्कार करीत रास्ता रोको केला. तसेच नांदणी नाक्याजवळ प्रकाश लठ्ठे, बाबासो बागडी, प्रशांत लठ्ठे, राकेश कांबळे यांनी निषेध नोंदवत रस्ता रोको केला. राज्यमंत्री यड्रावकर यांना कर्नाटक शासनाकडून अपमानकारक वागणूक दिल्याबाबत ग्रामीण भागात असंतोष पसरला आहे. सोशल मीडियावरसुद्धा निषेधाचे संदेश येत आहेत. कनवाडचे सरपंच डॉक्टर बाबासो अरसगोंडा यांनी या गोष्टीचा तीव्र निषेध व्यक्त केला असून मंत्री यड्रावकर यांना कर्नाटक शासनाने दिलेल्या वागणुकीबाबत निषेध नोंदवला आहे. तसेच संबंधित पोलीस अधिकाऱयांना बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे. 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये लोकशाहीविरोधी भूमिका घेणाऱया कर्नाटक शासनाचा निषेधाचा ठराव करून प्रत्येक ग्रामपंचायतीने राष्ट्रपतींकडे पाठवावा, असे आवाहन केले आहे.
दरम्यान यड्रावमधील नागरिकांनी एकत्रित येऊन कर्नाटक पोलिसांच्या व कर्नाटक शासनाच्या झुंडशाहीच्या निषेधाच्या घोषणा देत गावातून मोर्चाने जाऊन यड्राव फाटा चौकात रास्तारोको केला. यावेळी कार्यकर्ते अर्धातास रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. यादरम्यान इचलकरंजीकडून जयसिंगपूर, सांगलीकडे जाणारी-येणारी वाहतूक ठप्प झाली होती. याचबरोबर पंचगंगा साखर कारखाना, यड्राव, जांभळी, नांदणी मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. या ठिकाणी निषेध सभा घेऊन अर्ध्या तासानंतर रास्तारोको स्थगित केला. या आंदोलनात मल्लू मुरचुटे, बंडू उर्फ महावीर पाटील, दत्ता कोळी, दत्ता साळोखे, राकेश पाटील, कुणालसिंह निंबाळकर, विजय पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.