प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील साखर कारखान्यांच बहुसंख्य ऊसतोड मजूराचया टोळ्या न आल्याने कारखान्याच्या गळीत हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे ऊस वाहतूकदार, कारखान्याच्या व्यवस्थापनाबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे.
शिरोळ व हातकणंगले तालुक्यामध्ये श्रीदत्त, शरद ,जवाहर ,पंचगंगा व श्री गुरुदत्त हे पाच साखर कारखाने असून दोन खांडसरी कारखाने आहेत. चालू झाली अतिवृष्टीने या दोन्ही तालुक्यांमध्ये बहुसंख्य शेतात अध्यापही ओलावा आहे. गतसाली महापुराने तर चालू वर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या पाचही सहकारी साखर कारखान्यांना ऊसतोड मजुरांना पुरवठा करणारे मुकादम कमी- अधिक प्रमाणात मजूर न दिल्याने याचा विपरीत परिणाम कारखान्याच्या गळीत हंगामावर होत आहे. ज्या वाहनधारक मालकांनी ॲडव्हान्स 7 ते 10 लाख रुपयांपर्यंत एका टोळीला दिले आहेत. टोळ्या न आल्याने त्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.
ऊस वाहतूक वाहनधारकांना टोळीने फसविल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली अंदाजे दोनशे टोळ्या न आल्याने 12 ते 15 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वाहन धारक संघटनाही याविरोधात आवाज उठवणार असल्याचे श्री दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजीराव पाटील नरदेकर यांनी सांगितले. टोळ्यांना आल्याने बहुसंख्य साखर कारखान्या च्या गळीत हंगामावर परिणाम होत असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या शेतातील ऊस घालवण्याची चिंता लागून राहिली आहे.