सातारच्या महिलांनी तयार केले तीन लेयरचे मास्क
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना वायसर मुळे मास्कची मागणी वाढली आहे. बाजारात विविध प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. मात्र गरीब, गरजु, सर्वसामान्य लोकांना चांगल्या दर्जाचे मास्क मोफत तयार करून वाटण्याचे काम सातारच्या रूपा गोडबेले व कल्याणी घोरपडे या करत आहेत. शिल्लक राहिलेल्या कापडाचा वापर करून यांनी तीन लेयरची मास्क बनवले आहेत. आकर्षक असे मास्क मोफत मिळत असल्याने लोकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना वायरसमुळे लोकांकडून सुरक्षिततेचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. सर्वात जास्त मास्क आणि सॅनिटायझर यांचा वापर वाढला आहे. घरातून बाहेर पडताना, प्रवासादरम्यान तोंडाला मास्क लावले जात आहे. यामुळे मास्कची मागणी वाढली असून बाजारात कापडी, युज ऍन्ड थ्रो चे मास्क उपलब्ध आहेत. मात्र यांच्या किंमती गरीब, गरजु, सर्व सामान्याच्या खिशाला परवडत नाहीत. यामुळे काहीच लोकांकडून यांचा वापर करण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना चांगल्या दर्जाचे मास्क मोफत मिळावे म्हणून सातारच्या रूपा गोडबेले व कल्याणी घोरपडे यांनी कापडी मास्क बनवण्याचे काम हाती घेतले आहे.
रूपा गोडबेले या इंटेरिअरल डिझायनर आहेत. आणि कल्याणी घोरपडे यांचे लेडीज मटेरियलचे कल्याणी क्रिऐशन दुकान आहेत. दुकानातील मटेरियल पासून ड्रेस तयार करण्यात येतात. यावेळी काही कापड शिल्लक राहते. अशाच वेगवेगळया मटेरियलपासून शिल्लक चिंध्याचा ढिग दुकानात लागला होता. रूपा गोडबेले यांची अमेरिकेतील मैत्रिण असेच कापडापासून मास्क तयार करून यांचे वाटप करत आहेत. याच मैत्रीणीची प्रेरणा घेवून रूपा गोडबोले व कल्याणी घोरपडे यांनी मास्क बनवायला सूरूवात केली आहे. कापडी मास्क हे पातळ असतात. यामुळे यांचा वापर जास्त फायदा देणारा नाही. म्हणून यांनी तीन लेयर वापरून मास्क तयार केले आहेत. हे मास्क कानाच्या मागे अडकवण्यासाठी इल्यास्टिक लावण्यात आले आहेत. आकाराने मोठे असणारे हे मास्क जास्त काळ टिकणारे आहेत. सर्व मास्क सुती कापडाचा वापर करून बनवण्यात आले आहेत. रंगेबेरंगी, डिझानचे मास्क लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहेत. गेल्या 5 ते 6 दिवसापासून यांनी 250 ते 300 मास्क बनवले आहेत. अजून 1 हजार मास्क या बनवणार आहेत. या मास्कचे वैशिष्ट म्हणजे लोकांना मोफत मास्क देण्यात येत आहेत. भाजी-दुध विक्रेते, नातेवाईक, गरीब, गरजुंना यांचे वाटप करण्यात आले आहेत. यामुळे लोकांकडून यांची मागणी मोठया प्रमाणावर होत आहे. यांचा वापरामुळे लोकांना चांगला फायदा होत असल्याचे रूपा गोडबोले व कल्याणी घोरपडे यांनी तरूण भारतशी बोलताना सांगितले.