प्रतिनिधी / बेळगाव
दिवाळी सणानिमित्त संपूर्ण देशातच आनंदायी आणि उत्साही वातावरण असते. मात्र याचवेळी सीमेवर दहशतवादी हल्ल्यात भारताचे पाच जवान हुतात्मा झाले. त्यांना अनगोळ येथील शिवनेरी युवक मंडळाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. हनुमान मंदिर येथे दिवे लावून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रघुनाथपेठ, अनगोळ यांच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून टिळकवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक विनायक बडीगेर, ऍड. प्रवीण करोशी उपस्थित होते. सैनिक देशाचे संरक्षण करतात. म्हणूनच आम्ही सण व उत्सव साजरा करू शकतो. कोणताही सण राहिला तरी रात्रंदिवस सैनिक सीमेवर सेवा बजावत असतात. पाकिस्तान दहशतवाद्यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गोळीबार केल्यामुळे पाच जवान हुतात्मा झाले. त्यांनाही श्रद्धांजली वाहिली. प्रारंभी भावेश बिर्जे यांनी स्वागत केले. पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व ऍड. प्रवीण करोशी यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. हुतात्म्यांच्या प्रतिकृतीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.