प्रतिनिधी / सातारा :
काळ बदलत जातो तसा पैशाचा आकार बदल आहे. युती सरकारच्या काळात झुणका भाकर पेंद्रे गावोगावी सुरु होती. 1 रुपयात भाकरी आणि झुणका मिळायचा. त्यात पोट भरायचे. युतीचे सरकार गेले अन् ही योजना बासनात गुंडाळली गेली. सरकार असेपर्यंत योजनेला चांगला प्रतिसाद होता. आताही महाविकास आघाडीचे सरकार आल्याने त्यांनी 10 रुपयांमध्ये शिवभोजन ही योजना सुरु केली आहे. या योजनेमध्ये शहरात जी केंद्रे सुरु झाली आहेत. त्या केंद्रामध्ये शिवभोजन आहे तरी कसले हे पाहण्यासाठी जिह्याच्या कानाकोपऱयातून साताऱयात कामानिमित्ताने आलेले नागरिक याचा आस्वाद घेताना दिसू लागले आहेत. वेळ आणि संख्या मर्यादित असल्याने वादावादीचे प्रकार घडू लागले आहेत.
महाविकास आघाडीच्या सरकारने केलेली शिवभोजन योजनेचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाच्या दिवसापासून झाला. सातारा शहरात मोजक्या ठिकाणी केंद्रे आहेत. या केंद्राची माहिती नागरिकांकडूनच माऊथ टू माऊथ अशीच होत आहे. माऊथ टू माऊथ जाहिरात अगदी जिह्यातील शेवटच्या गावापयंत पोहचली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून साताऱयात कामानिमित्ताने आलेला नागरिक हा केंद्र शोधत शोधत येतो आहे. त्या केंद्रावर शिवभोजनाचा आस्वाद घेण्याकरता येतो तेव्हा पेंद्रावर भली मोठी गर्दी दिसते. गर्दी असली तरीही थांबून शिवभोजन आहे तरी कसे याचा लाभ घेण्याकरता त्याच रांगेत थांबताना दिसतात. मात्र, सकाळी 12 ते दुपारी 2 याच वेळेत ही योजना असल्याने केंद्रावर पोहचले तरीही गर्दीतून शिवभोजन मिळेल काय याचीच लाभार्थ्यांस चिंता असते. त्यामुळे वादावादीचे प्रकारही घडू लागले आहेत. शिवभोजनाचा लाभ घेण्याकरता मोबाईलवर शिवभोजन योजनेचे ऍपलिकेशन आहे. त्या ऍपलिकेशनवर लाभार्थ्याचा फोटो अन् त्याचे नाव व मोबाईल नंबर अपलोट केली जात आहे. सही घेवून पुन्हा एक कुपन दिले जाते. ते कुपण दिल्यानंतर आतमध्ये वेटर ती थाळी आणून देतो. थाळीमध्ये दोन चपात्या, एक वाटी वरण, एक वाटी भाजी आणि एक वाटी भात याचा समावेश आहे. ही थाळी आहे तरी कसली हे पाहण्याकरता साताऱयातल्या केंद्रावर गर्दी दिसत आहे. त्यामुळे नजिकची नाष्टय़ाची हॉटेल्सवरही त्याचा परिणाम होत आहे.