ऑनलाईन टीम / मुंबई
रसाळ, लालित्यपूर्ण शैलीने शिवाजीमहाराजांचे चरित्र उभ्या महाराष्ट्राच्या घराघरात नेणाऱ्या अमोघ वक्तृत्वाने मराठीजनांना खिळवून ठेवण्याची कला आत्मसात केले आहे. त्यांनी हे कौशल्य कमावले आहे. अखेरपर्यंत कोरोना साथ सुरू होईपर्यंत व्याख्यानांच्या आणि अन्य कामांच्या निमित्ताने देशा-परदेशात अखंड भ्रमंती सुरू असलेल्या बाबासाहेबांनी नुकतेच शंभराव्या वर्षांत पदार्पण केले होते.
गेल्या महिन्यातील २६ ऑक्टोबर रोजी त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेही पहिले दोन दिवस ते व्यवस्थित बोलत होते. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना न्यूमोनिया झाला आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती पुन्हा सुधारणार का असा समस्त इतिहास प्रेमींना गहण प्रश्न पडला आहे.