प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्याला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे. त्याचे अनेक दाखले इतिहासात पहायला मिळतात. इतिहासाचे काही इतिहासकार सोयीनुसार अर्थ लावतात. ऐतिहासिक अशा साताऱयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शाहु महाराजांच्या साताऱयात नगरसेवक विजय काटवटे यांनी शिवसृष्टी राजवाडा बसस्थानकावर साकारण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनासाठी काही दिवस उरले असताना शिवसमर्थ शिल्पाचा वाद उफाळून आणला गेला आहे. हा वाद आताच नेमका कशासाठी?, सातारा पालिकेची एका वर्षाने निवडणूक होणार आहे. त्या निवडणूकीच्या अनुषंगाने हा वाद उफाळून आणल्याची चर्चा आहे. पोलिसांनीच या वादावर पडदा टाकावा, अशी मागणी होवू लागली आहे.
राजवाडा बसस्थानक तसे दुर्लक्षित होते. त्याच बसस्थानकाचे रुपडे पालटण्यासाठी नगरसेवक विजय काटवटे यांनी प्रकर्षाने प्रयत्न सुरु केले अन कामास प्रारंभ झाला. बघता बघता बसस्थानकाचा चेहरामोहरा त्यांनी बदलून टाकला. तेथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या मोजक्या प्रसंगावर शिवसृष्टी करण्याचे काम पूर्णत्वास नेले आहे. त्यामधील छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीच्या शिल्पावर काही संघटनांनी आक्षेप घेत वाद निर्माण केला आहे. वास्तविक तशी या शिल्पाअगोदरच तशीच शिल्पे राजधानी साताऱयात आढळून येतात. त्यापैकी वाघाची नळी येथे एक तसेच शिल्प दिसून येत आहे. त्या शिल्पामधून कोणतीही जातीय तेढ निर्माण केली जात नाही. परंतु काही संघटनांनी त्यावर आक्षेप घेत विरोध करताच त्या शिल्पाबाबत काटवटे यांच्यासह काही संघटनांनी पुरावेच सादर केले. त्यामुळे हा वाद चघळू लागला आहे. वास्तविक राजवाडा बसस्थानकावर ऐतिहासिक साताऱयाचे महत्व सांगणारी शिवसृष्टीबरोबरच भव्य असे या परिसरात वाचनालयही उभारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, शिल्पास होत असलेला विरोध पाहून नेमके राजकारण कशाचे सुरु आहे याचीच चर्चा आता राजवाडा बसस्थानक व मंगळवार तळे रोडवर सुरु आहे.
ठिणगी टाकणाऱयांवर पोलिसांनी पाळत ठेवावी
वादाचा कोणताही आणि कसलाही मुद्दा नसताना शिवसमर्थ शिल्पावरुन सध्या धुमसत व पेटत असलेल्या वादावर पोलीस प्रशासनानेच आता तोडगा काढवा, ही ठिणगी टाकून वाद निर्माण करणाऱयांवर पोलिसांनीच लक्ष ठेवावे, अशी मागणी होवू लागली आहे.