खासदार विनायक राऊत आणि नीलेश राणे वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिह्यांमध्ये गेले काही दिवस राणेविरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटलेला आहे. सिंधुदूर्गमध्ये खासदार विनायक राऊत आणि भाजप प्रदेश सचिव नीलेश राणे यांचे प्रतिकारत्मक पुतळे जाळण्याचे प्रकार घडले. या प्रकरणात उदय सामंत यांनी शिवसेनेच्या नेत्यांना ही कानपिचक्या दिल्या आहेत. राजकीय जीवनात काम करत असताना आपल्यामुळे काही गोष्टी वादाच्या निर्माण होणार नाहीत, याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे, अशा शेलक्या शब्दात सामंत यांनी शिवसेनेच्या नेत्यांना सुनावलंय. तर संबंधित भाजप नेत्यांनाही टोला लगावला आहे.
माजी आमदार राजन तेली यांनी केलेल्या आरोपाचा उदय सामंत यांनी समाचार घेतला. राजन तेलींनी पुरावे द्यावेत अन्यथा राजकार सोडावे असे आव्हान उदय सामंत यांनी दिले. शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल झालाय, गुन्हा दाखल करण्यासाठी राजकीय दबाव टाकला जातोय. माजी आमदार राजन तेली यांनी केलेल्या आरोपाचे खंडन उदय सामंत यांनी केलंय. या प्रकरणातले पुरावे राजन तेली यांनी यावेत ते दिल्यास आपण राजकारण सोडू, अन्यथा तुम्ही सोडा असा थेट आव्हान उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेय.
शहरामध्ये नळपाणी, सीएनजीचे काम सुरू असल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली असून येत्या आठ दिवसांनी रस्त्यांचे काम सुरू होणार आहेत. याबाबत आपण बैठकही घेतल्याचे सामंत यांनी सांगितले. तसेच शहरातील काही खाजगी जागा नगर परिषदेने ताब्यात घेतले आहे. यामध्ये तेलीआळीतील जागेवर गार्डन तर आठवडाबाजारलगत असलेल्या जागेमध्ये कम्युनिटी हॉल बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.