प्रतिनिधी/ बेळगाव
छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे. परंतु काही समाजकंटकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न केले जात आहेत. तसेच दोन समाजांमध्ये दरी निर्माण करण्याचा वारंवार प्रकार घडत आहे. अशा व्यक्तींवर कारवाई करावी व असे प्रकार यापुढे घडणार नाहीत याबाबत खबरदारी घ्यावी अशी मागणी विश्वहिंदू परिषद – बजरंगदलच्या वतीने जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा, कित्तूर राणी चन्नम्मा ही सर्व आमच्या हिंदू बांधवांची दैवते आहेत. परंतु काहीजण मात्र यांची बदनामी करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. छत्रपती शिवरायांचा मोठा इतिहास असून, तो देशासाठी अभिमानकारक आहे. अशा दैवताचा अपमान करणाऱयांवर कडक कारवाई करण्याची मागणी विश्वहिंदू परिषद बजरंगदलने केली आहे. यावेळी बेळगाव परिसरातील विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.