आण्णाप्पा पाटील/ बहाद्दरवाडी
गेल्या आठ दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेत शिवारातील बांध फुटून व शिवारात पाणी साचून राहिल्यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्मयातील बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी शिवारातील पिकांचे नुकसान झाले असल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
संततधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. रस्त्यावरही पाणी आले होते. नदी नाले तुडुंब भरून वाहत होते. पावसाचा जोर वाढल्यामुळे थेट शिवारात पाणीच पाणी झाले यामुळे तालुक्मयातील सर्रास भागातील शेतामध्ये बांध फुटून हजारो एकर शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्याबरोबर नदी नाल्यांचा गाळही शेतात आला. यामुळे या गाळाच्या मातीखाली पिके सापडली.
पावसामुळे नदी काठच्या शेती पाण्याखाली गेल्या शेतातील भात पिकांसह अन्य पिके कुजून गेली. मार्कंडेय नदीकाठाजवळील राकसकोप, यळेबैल, सोनोली, बेळगुंदी, कल्लेहोळ, बोकनूर, अलतगे, बाची, कंग्राळी, कडोली आदी परिसरातील भात पिकांचे नुकसान झाले.
बळ्ळारी नाल्याला पूर आल्यामुळे धामणे, येळ्ळूर, जुनेबेळगाव, बसवानकुडची, निलजी आदी भागातील शेतीचेही नुकसान झाले. तालुक्मयाच्या पश्चिम भागात अधिक पाऊस झाल्यामुळे संतिबस्तवाडजवळील मुंगेत्री नदीलाही पूर आला होता. बहाद्दरवाडी, किणये, रणकुंडये, वाघवडे, संतिबस्तवाड या परिसरातील नदी काठची भात शेती पाण्याखाली जाऊन पिकांचे नुकसान झाले.
गत वषी महापुरामुळे शेतीचे नुकसान झाले. यामुळे शेतकऱयांवर उपासमारीची वेळ आली. यंदा पावसाने बऱयापैकी साथ दिली होती. मात्र आठ दिवसापूर्वी झालेल्या संततधार पावसाने शेतीचे नुकसान केले असून, खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱयांनी वारेमाप पैसा खर्च केला होता. मात्र झालेल्या पावसामुळे त्यांचा हा केलेला खर्च पिकनुकसानीमुळे पाण्यासोबत वाहून गेला.
सुरेश डुकरे
पावसाने शेतामधील बांध फुटून भात पिकांसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. किणये डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी थेट बेळगाव चोर्ला रस्त्याच्या बाजूला मुंगेत्री नदीजवळील असलेल्या शेत शिवारात शिरले. यामुळे आमच्या परिसरातील शेतकरी संकटात सापडला आहे. कृषी खात्याच्या अधिकाऱयाने या भागातील पिकांचा सर्वे करून नुकसानग्रस्त शेतकऱयांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
रघुनाथ सुतार
आमच्या शेताजवळील तलाव पावसामुळे तुंडुब भरला आणि तलावाचे पाणी नाल्यात आले व नालाही फुटून शेतातील बांध फुटून दोन एकरातील भात पिकांचे नुकसान झाले आहे. उन्हाळय़ातच आठ तास जेसीबी लावून बांध तयार करून घेतलो होतो. कर्ज काढून पिकांसाठी गुंतवणूक केली आहे. मात्र निसर्ग साथ देत नसल्यामुळे आता कर्ज कसे फेडायचे, याची चिंता आम्हा कुटुंबियांना लागली आहे.
कल्लाप्पा पाटील
मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला की, बाळगमट्टी, बामणवाडी, शिवारातील भात पिकांचे नुकसान हे ठरलेलेच असते. गेल्या वषी आलेल्या महापुरात पिकांचे नुकसान झाले. त्याचीही नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. पुन्हा या वषीही त्याच परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाच्या अधिकाऱयाने शेतकऱयांच्या थेट बांधापर्यंत जाऊन आम्हाला भरपाई दिली पाहिजे.