मार्कंडेय नदी-बळळारी नाल्यात पाण्याचा प्रवाह वाढला : पाणतळ शिवाराला पिकांना फटका
प्रतिनिधी/ बेळगाव
पावसाने गुरुवारी काहीशी उघडीप दिली होती. मात्र गुरुवारी रात्रीपासून पावसाला पुन्हा जोरदार सुरुवात झाली. शुक्रवारी दुपारपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे शुक्रवारीही सकाळच्या सत्रामध्ये शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसामुळे हवेमध्ये काहीसा गारवा निर्माण झाला आहे.
दुपारी मात्र पावसाने काहीशी उसंत घेतली होती. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. बुधवारी झालेल्या दमदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. मार्कंडेय नदी, बळ्ळारी नाला परिसराला पूर आला आहे. गुरुवारी मात्र पावसाने बऱयापैकी उघडीप दिल्यामुळे काही भागातील पूर ओसरला होता. मात्र शुक्रवारी झालेल्या पावसामुळे पुन्हा बळ्ळारी व मार्कंडेय नदीत पाण्याचा प्रवाह वाढला होता.
भातासह सर्वच पिकांना हा पाऊस फायद्याचा ठरला आहे. थोडा पाऊस अधिक झाल्याने नदी काठावरील पिकांना मात्र फटका बसला आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य जनता तणावाखाली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे विविध भागांतील घरे कोसळली आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उघडय़ावर पडले आहेत. बुधवारी पावसाचा जोर पाहता मागीलवषी प्रमाणेच पुन्हा पूर येणार काय? अशी भीती निर्माण झाली होती.
पावसामुळे बाजारपेठेतही गर्दी कमी
या पावसामुळे बाजारपेठेतही गर्दी कमी झाली होती. कोरोना आणि पाऊस यामुळे घरात राहणेच अनेकांनी पसंत केले. त्यामुळे बेळगावच्या मुख्य बाजारपेठेत गर्दी कमी झाल्याचे दिसून येत होते. श्रावण महिन्यात दरवषी शहर व उपनगरांमध्ये मंदिरांमध्ये मोठी गर्दी होत असते. मात्र कोरोना आणि पावसामुळे जनता फिरकली नाही. या दमदार पावसामुळे जिह्यातील जलाशयांना बऱयापैकी पाणी आले आहे. काही जलाशये तुडुंब भरली आहेत. तर काही जलाशये अधिक भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. राकसकोप, मार्कंडेय, नविलतीर्थ ही जलाशये तुडुंब भरली आहेत. हिडकल जलायश मात्र अजूनही भरले नाही. महाराष्ट्रातून मोठय़ा प्रमाणात पाणी येत असल्यामुळे हे जलाशयही काही दिवसांत भरेल, अशी शक्मयता वर्तविण्यात येत आहे. दुपारनंतर पावसाने बऱयापैकी उघडीप दिली आहे.