वार्ताहर/किणये
तालुक्यातील काही भागात शुक्रवारी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. वारंवार होत असलेल्या वादळी वाऱयासह अवकाळी पावसामुळे शेतकऱयांच्या भाजीपाला पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. तालुक्यात गुरुवारी सर्वच भागात पाऊस झाला. या पावसामुळे झाडे, इमारतींवरील पत्रे उडून जाण्याचे प्रकार घडले. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी पाऊस येण्यास प्रारंभ झाला. या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून कोरोनाच्या संकटाबरोबर बळीराजाला पावसामुळे फटका बसत आहे.