कोरोनाची धास्ती : लग्न समारंभाला प्रशासनाच्या परवानगीची गरज असल्याने 125 हून अधिक नागरिकांनी लावली तहसीलदार कार्यालयात रांग
पिराजी कुऱहाडे / खानापूर
कोरोना महामारीचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार विकेंड कर्फ्यूसह कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विवाह सोहळय़ांबरोबर धार्मिक कार्यक्रम, यात्रा, सभा-समारंभ कार्यक्रमांवर अटी लादण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावषीही शुभमंगल करताना सावधानता बाळगण्याची वेळ पुन्हा एकदा ओढवली आहे.
मागील वषी 21 मार्चनंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू झाल्यामुळे विवाह सोहळय़ांसह धार्मिक कार्यक्रम बंद पडले. ऑक्टोबरनंतर या कोरोना महामारीचे संकट थोडय़ाफार प्रमाणात रोखले गेले. यावर जगभरात कोरोना प्रतिबंधक लसी आल्याने आशेचा किरण आला असताना पुन्हा कोरोना विषाणूने आपले तोंड वर काढले आहे. त्यामुळे यावषीदेखील आता सर्वसामान्यांसमोर महामारीचा डोंगर उभारण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीमुळे नाईट कर्फ्यू आणि विकेंड कर्फ्यू लागल्याने विवाह सोहळा केवळ 50 नागरिकांच्या उपस्थितीत पार पाडण्यासाठी तहसीलदारांची परवानगी अत्यावश्यक असल्याची अट लादण्यात आली आहे.
सर्वांनाच बसत आहे आर्थिक फटका
खानापूर तालुक्मयात गुरुवारी सकाळपासून येत्या आठवडाभरात नियोजित विवाह सोहळय़ांच्या परवानगीसाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. सकाळपासून तहसीलदार कार्यालयात तब्बल 125 हून अधिक नागरिकांनी विवाह सोहळय़ांसाठी परवानगी मागितली आहे. दरवषी या दोन महिन्यात मोठय़ा प्रमाणात विवाह होतात. पण मागील वषीपासून लागलेल्या कोरोना महामारीच्या ग्रहणामुळे विवाह सोहळय़ांवर विरजण पडले. परिणामी वाजंत्रीपासून मंगल कार्यालय मालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेकांनी नियोजीत मंगल कार्यालयांतील विवाह रद्द केले असून घरासमोर कार्यक्रम आटोपून घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे मंगल कार्यालय मालकांसह सर्वसामान्यांचे जीवन हलाखीचे बनले आहे.
विवाह सोहळा म्हटला की बाजारपेठपासून स्वयंपाक घरापर्यंत लागणारे साहित्य, सजावटीसाठी मंडप, वाजंत्री, स्वयंपाकी किंवा त्यावर आधारित अनेक मंडळी यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गेल्या दोन दिवसात राज्य शासनाने विकेंड व नाईट कर्फ्यूची घोषणा केल्यानंतर शनिवारी व रविवारी होणाऱया विवाह समारंभांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. गुरुवार दि. 22 रोजी अनेक ठिकाणी विवाह सोहळे होते. परंतु बुधवारी रात्रीपासूनच नाईट कर्फ्यू असल्यामुळे गुरुवारच्या विवाह सोहळय़ांवर तितकासा परिणाम जाणवला नाही. तरीही अनेक नागरिकांनी विवाह सोहळय़ांच्या ठिकाणी गर्दी न करता नियमांचे पालन करून विवाह सोहळे सुरळीत पार पाडले. शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत विकेंड कर्फ्यू असल्यामुळे या काळात होणारे विवाह समारंभ मात्र अडचणीत आले आहेत. यामुळे परवानगी मिळविण्यासाठी गुरुवारी सकाळपासून वधू-वरांच्या अनेक मंडळींची धावपळ तहसीलदार कार्यालयात दिसून येत होती. अनेक ठिकाणी गर्दीपासून दूर राहण्यासाठी केवळ भेटीगाठी करून शुभेच्छा देण्याकडे सुज्ञ नागरिकांचा कल दिसून आला.
विवाह परवानगीसाठी 50 नागरिकांची नावे : उपस्थितांसाठी पास देणार
विवाह समारंभ आयोजित करण्यासाठी तहसीलदारांची परवानगी घेऊन लग्नाला उपस्थित राहणाऱया 50 जणांची नावे देऊनच अर्ज करण्याची प्रक्रिया लादली आहे. त्यामुळे परवाना मिळविण्यासाठी आलेल्यांची गोची होत आहे. विवाह सोहळय़ाला परवानगीसाठी लग्नपत्रिका, परवानगी घेणाऱयांचे आधारकार्ड तसेच लग्नाला उपस्थित राहणाऱया 50 नागरिकांची लेखी स्वरुपात नावे अशा कागदपत्रांची मागणी तहसीलदार कार्यालयाकडून करण्यात येत आहे.
नावे दिलेल्या व्यक्तींनाचा विवाह समारंभात उपस्थित राहण्यासाठी पास देण्यात येणार असल्याचेही समजते. त्यामुळे या परवानगीसाठी लागणाऱया 50 नागरिकांची नावे कशी जोडावी, हा प्रश्न अनेकांसमोर उभा ठाकला आहे. परवानगी मिळाल्यानंतर संबंधित गावात पंचायत पीडीओंच्या किंवा नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकाऱयांच्या नेतृत्वाखाली नोडल अधिकाऱयाची नेमणूक करण्यात येणार आहे.
ग्राम पंचायतींवर नोडल अधिकारी नेमणार
तालुक्यातील 51 ग्राम पंचायतींवर नोडल अधिकाऱयांची नेमणूक करण्यात येणार असून संबंधित लग्न सोहळय़ांच्या ठिकाणी नियमावलीचे पालन केले जात आहे की नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. त्यामुळे आता विवाह समारंभाचे आयोजन करताना वधू-वरांच्या घरच्या मंडळींमध्ये एक प्रकारे धास्ती निर्माण झाली आहे.
मागील वषी पूर्णतः लॉकडाऊनमुळे बहुतांश ठिकाणी विवाह सोहळे रद्द करण्यात आले. यावषी लॉकडाऊनला वाढता विरोध लक्षात घेता केवळ नियमावलीचे पालन करून कोरोना संक्रमणाला हटविण्यासाठीचा प्रयत्न केला जात आहे.
हॉटेल बंदच्या सूचना
जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी परवानगी दिली आहे. पण हॉटेल व्यावसायिकांना व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खानापूर तालुक्मयाच्या विविध भागांमध्ये अनेक ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीला घरीच क्वारंटाईन करून सुरक्षितता राखण्यासाठी शासनातर्फे सूचित केले जात आहे.
निर्बंध पाळणे अत्यावश्यक
विवाह समारंभ अथवा अंत्यसंस्काराची गर्दी, यात्रा महोत्सव, सभा कार्यक्रम या ठिकाणी कोरोना संक्रमणाची धास्ती अधिक असते. विवाह समारंभासाठी तळागाळातून पै-पाहुणे उपस्थित राहतात. कर्नाटक तसेच महाराष्ट्रात वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेता विवाह समारंभाला परप्रांतातून येणाऱयांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी संक्रमणाचा धोका अधिक प्रमाणात असू शकतो. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लादण्यात आलेले हे निर्बंध पाळणे अत्यावश्यक असून नागरिकांनी याचे पालन करावे, अत्यावश्यक गोष्टीसाठीच घरातून बाहेर पडावे, मास्क वापरून, सामाजिक अंतर राखून कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकाने कार्यतत्पर राहिले पाहिजे.
तहसीलदार- रेश्मा तालिकोटी