प्रतिनिधी/ पणजी
सरकारने पर्यटन हंगामाची तयारी सुरू केली आहे. किनारी भागातील शॅक ऑक्टोबरपासून खुले करण्याची तयारी सुरू झाली आहे. गोव्यात पहिले चार्टर विमान रशियन पर्यटकांना घेऊन ऑक्टोबरमध्ये दाखल होणार असल्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री मायकल लोबो यांनी सांगितले.
बार सप्टेंबरमध्ये खुले होण्याची शक्यता
राज्यातील बार सप्टेंबरमध्ये खुले करण्यास मान्यता दिली जाण्याची शक्यता लोबो यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर केंद्रीय गृहव्यवहार मंत्रालयाची यासंदर्भातली मान्यताही मिळवली जाणार आहे. पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याच्या तयारीत आहेत. रशियन चार्टर विमान ऑक्टोबरच्या मध्यावर गोव्यात येणार असल्याने त्यांना आताच मान्यता द्यायला हवी, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचेही लोबो यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर पर्यटन चार्टर विमानांच्या सोयीच्यादृष्टीने केंद्रीय गृहव्यवहार मंत्रालय व नागरी हवाई मंत्रालयाने प्रवेशासंदर्भात नियम शिथील करणे आवश्यक असल्याचे लोबो यांनी सांगितले.
दरम्यान, पर्यटन हंगाम राज्यात सुरू व्हायला हवा व ऑक्टोबरपासून पर्यटक गोव्यात यायला हवे. यादृष्टीने पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक प्रयत्नशील आहेत. मागील पर्यटन हंगामात पूर्ण निराशा झाली. त्याचा मोठा फटका व्यावसायिकांना बसला. किनारी भागातील आणि पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात तरी त्यासाठी आताच मान्यता द्यायला हवी, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचेही लोबो यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर पर्यटक चार्टर विमानांच्या सोयीच्या दृष्टीने केंद्रीय गृहव्यवहार मंत्रालय व नागरी हवाई मंत्रालयाने प्रवेशासंदर्भातील नियम शिथील करणे आवश्यक असल्याचे लोबो यांनी सांगितले.
दरम्यान, पर्यटन हंगाम राज्यात सुरू व्हायला हवा व ऑक्टोबरपासून पर्यटन गोव्यात यायला हवे. यादृष्टीने पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक प्रयत्नशील आहेत. मागील पर्यटन हंगामात पूर्ण निराशा झाली. त्याचा मोठा फटका व्यावसायिकांना बसला. किनारी भागातील आणि पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात तरी पर्यटन व्यवसाय सुरू व्हावा यासाठी सरकार आणि पर्यटनाशी संबधित व्यावसायिक प्रयत्नशील आहेत. किनारी भागातील व्यावसायिकासह राज्यातील तारांकित हॉटेल आणि टॅक्सी व्यावसायिक पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहेत. यंदाच्या हंगामात निराशा झाल्यास या व्यावसायिकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.