मुंबई / वृत्तसंस्था
सोमवारी जवळपास 1800 अंकांनी घसरलेला मुंबई शेअरबाजार मंगळवारी चांगलाच सावरल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी त्याने 1,736.21 अंकांची उसळी घेतली. त्यामुळे मंगळवारी झालेली गुंतवणूकदारांची हानी त्वरित भरुन निघाली. रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव काही प्रमाणात निवळल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास बळावला आणि त्यांनी पुन्हा जोरदार खरेदी करुन सोमवारची भरपाई केली. अपेक्षेपेक्षा लवकर शेअरबाजार सावरल्याचे दिसून आले आहे, अशी प्रतिक्रिया अनेक तज्ञांनी व्यक्त केली. भारताप्रमाणे आशिया आणि जगातील इतर शेअरबाजारही मंगळवारी कमी-अधिक प्रमाणात सावरले होते.