एचडीएफसी, आयटीसी आणि भारती एअरटेलच्या कामगिरीने बाजार सावरला
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतामुळे देशातील शेअर बाजार सलग तिसऱया दिवशी तेजीत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरातील कामगिरीनंतर प्रामुख्याने एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयटीसी आणि भारती एअरटेलचे समभागाच्या तेजीमुळे भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स सावरल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स 256.71 अंकांनी वधारुन निर्देशांक 49,206.47 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 98.36 अंकांनी वधारुन निर्देशांक 14,823.15 वर बंद झाल्याची नोंद केली आहे.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीनंतर प्रमुख कंपन्यांपैकी एचडीएफसीचे समभाग सर्वाधिक म्हणजे दोन टक्क्यांपेक्षा अधिकने वाढले आहेत. याव्यतिरिक्त बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, एनटीपीसी, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट आणि ओएनजीसीचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत. याच्या विरुद्ध बाजूला मात्र बजाज ऑटो, बजाज फायनान्स, इन्फोसिस आणि कोटक बँक यांचे समभाग मात्र घसरणीत राहिले आहेत.
बाजारात का आली तेजी
देशातील शेअर बाजारात सलग तिसऱया दिवशी तेजीची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये जागतिक बाजारातील मागील काही दिवसांपासून सकारात्मक संकेत मिळत असल्याच्या कारणामुळे भारतीय बाजार तेजीत राहिल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रमुख क्षेत्रांची बाजी
आर्थिक आणि धातू क्षेत्रातील समभागांच्या कामगिरीमुळे मजबूत स्थिती राहिली होती. सार्वजनिक क्षेत्रातील बँका वगळता अन्य प्रमुख क्षेत्रातील निर्देशांकात तेजीची नोंद केली होती. याचदम्यान धातू कंपन्याचे समभाग सर्वात आकर्षणाचा भाग राहिला आहे. तिसऱया तिमाहीमधील काही कंपन्यांच्या अहवालाचाही प्रभाव शुक्रवारच्या सत्रात भारतीय बाजारावर राहिला असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
आशियातील अन्य बाजारांमध्ये शांघाय आणि हाँगकाँगच्या बाजारात घसरण राहिली आहे. टोकीओ आणि सोलमधील शेअर बाजार सकारात्मक कल राहिला आहे.