ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मागील 15 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. युनायटेड किसान मोर्चाचे नेते गुरनाम सिंह चधुनी यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
युनायटेड किसान मोर्चाने तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन पुकारले होते. हे कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केल्याप्रमाणे संसदेत रद्द करण्यात आले आहेत. त्यानंतर केंद्र सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आपापल्या घरी जाण्याची विनंती केली होती. मात्र, एमएसपी कायदा, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई मिळावी आदी मागण्या प्रलंबित असल्याने हे आंदोलन तात्काळ मागे घेणार नसल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले होते. मात्र, युनायटेड किसान मोर्चाने हे आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे.
गुरनाम सिंह म्हणाले, आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत. मात्र, ते संपवत नाही. जेव्हा सरकार सर्व मागण्या मान्य करेल तेव्हाच आम्ही धरणे संपवू.