पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’ : कृषी विधेयके लाभदायी असल्याचा दावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संसदेकडून मंजूर करण्यात आलेल्या कृषीविषयक विधेयकांचा शेतकऱयांना भरपूर फायदा होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मध्ये सांगितले. या विधेयकांच्या मंजुरीमुळे शेतकरी कोठेही शेतमालाची विक्री करु शकतील असा दावा करत देशातील शेतकरी, आमची गावे हाच आत्मनिर्भर भारतचा कणा आहे, असे ते म्हणाले. देशाची कृषीव्यवस्था मजबूत असतील तर आत्मनिर्भर भारतचा पाया मजबूत होईल, असेही त्यांनी सांगितले.
कृषी विधेयकांच्या मंजुरीमुळे शेतकऱयांना मनाप्रमाणे दर मिळेल. या नव्या विधेयकामुळे शेतकऱयांना धान्योत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य मिळेल. जो जमिनीशी जास्त जोडलेला असतो तो वादळांमध्येही अढळ राहतो. कोरोनाच्या या कठीण काळात आपले कृषी क्षेत्र, आमचे शेतकरी याचे मूर्तीमंत उदाहरण असल्याचे पंतप्रधान म्हणाले. शेती क्षेत्रात अनेक नवे बदल होत आहेत. या बदलांची चर्चा माझ्याशी शेतकरी संघटना करत असतात. त्यांच्या माध्यमातून या क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या जात असल्याचे मोदींनी सांगितले.
कोरोना काळात संपूर्ण जग नव्या आव्हानांना तोंड देत आहे. कोरोना संसर्गाला आता सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. आता लोकांना जास्त काळ घरात राहणे कठीण होत चालले आहे. मात्र हल्लीच्या काळात कुटुंब पद्धतीही बदलली आहे. घरात ज्ये÷ माणसे नसल्याने गोष्टी सांगण्यास कुणी नाही. तसेच मिळालेला वेळ आपण कसा घालवायचा हा प्रश्न अनेक कुटुंबांपुढे उभा ठाकला आहे. हितोपदेश आणि पंचतंत्र यांची परंपरा असलेला आपला देश आहे. धार्मिक कथा सांगण्याचीही देशाला परंपरा आहे. आपल्याकडे विविध धार्मिक कथा प्रसिद्ध आहेत. त्यांचा आधार घेत देशवासियांनी दर आठवडय़ाला गोष्टींसाठी, कथांसाठी वेळ काढावा असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. कोरोना काळाने आपल्याला एकत्र राहण्याचे महत्त्व शिकवले आहे. अशावेळी कथा सांगण्याची कला अवगत करा असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.