शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात रत्नागिरी जिल्हय़ाचीही निवड
प्रतिनिधी/ रत्नागिरी
‘विकेल ते पिकेल’ या महत्वाकांक्षी कृषी प्रकल्पासाठी रत्नागिरी जिल्हय़ाचीही निवड करण्यात आली आहे. जिह्यात आंबा, काजू, लाल व सेंद्रीय भात, कोकम, रोपवाटिका, फळप्रक्रियाला चालना देण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक महसूली मंडळात 500 हेक्टरचे क्लस्टर केले जाणार आहे. जिह्यात 27 मंडळे आहेत. पहिल्या वर्षी सुमारे साडेतेरा हजार हेक्टर क्षेत्रातील उत्पादन वाढणार आहे.
शेतकरी ते ग्राहक साखळी निर्माण करुन दलालांना ‘दे धक्का’ देण्याचा उद्देश आहे. चार वर्षात त्या-त्या उद्योगाखालील क्षेत्र व उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी, उद्योजकांना अनुदान दिले जाणार आहे. या योजनेसाठी कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पाच जिह्यांची निवड झाली आहे. महसूली मंडळात 500 हेक्टरचे क्लस्टर उभारले जाणार आहे. उद्योगक्षम शेती व गुणवत्तापूर्ण उत्पादन हे पुढील 4 वर्षात कृषी विभागाचे प्रमुख उद्दीष्ट राहील, अशा सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार मंडळस्तरावर नियोजन केले जात आहे. रत्नागिरीत कृषी अधिकाऱयांनी बैठक घेऊन तयारी सुरु केली आहे. यावेळी उपविभागीय कृषी भाग्यश्री नाईकनवरे, तालुका कृषी अधिकारी व्ही. एम. हेगडे यांच्यासह मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते. यामध्ये रत्नागिरी जिह्यात उत्पादित होणाऱया आंबा, काजू, लाल भात/सेंद्रीय भात, ओले काजूगर, कोकम, फळप्रक्रिया, रोपवाटिका व्यवसायाला चालना दिली आहे. या प्रमाणेच अन्य 4 जिह्यात वेगवेगळ्या उद्योगांचा समावेश आहे.
योजनेची उद्दीष्टेः
@स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी विचारात घेऊन पीक आराखडा करणे.
@अल्पभूधारक शेतकरी व कृषी उद्योजकांना संघटित बाजारपेठेत देणे.
@खासगी क्षेत्राचा आर्थिक सहभाग घेऊन व्यवस्थापन कौशल्याच्या कृषी व्यवसायासाठी वापर करणे.
@शेतकरी समूहांना प्रोत्साहन देऊन गटशेती व करारशेतीला प्रोत्साहन देणे.
@गटशेती योजनेत प्रत्येक वर्षी 500 प्रमाणे चार वर्षात 1000 गट स्थापन करणे.
@त्या गटांची शेतकरी उत्पादक कंपन्यांशी घालणे.
@शेतकऱयांना सुविधा देण्यासाठी भरीव अनुदान राज्य शासन देणार आहे.
जिल्हय़ातील कृषीक्षेत्रासह उत्पादकता वाढीचे लक्ष्य
जिह्यात आंब्याचे क्षेत्र 66,433 हेक्टर आहे. उत्पादन 1 लाख 30 हजार मेट्रीक टन येते. 2025 पर्यंत पाच वर्षात ते उत्पादन 4 लाख 52 हजार मे. टनाचे लक्ष आहे. काजूचे सध्याचे क्षेत्र 1 लाख 9 हजार हेक्टर आहे 1 लाख 24 हजार मे. टन उत्पादन मिळते. पुढील 5 वर्षात 1 लाख 14 हजार क्षेत्र होईल. भाताचे उत्पादन क्षेत्र 67 हजार हेक्टरवरुन 73 हजार हेक्टरपर्यंत वाढवण्यात येणार आहे.