महागाई कमी करण्यासाठी महिला कॉग्रेस कमिटीचे निवेदन
प्रतिनिधी/ सातारा
दिल्ली येथे गेल्या एकशे तीस दिवस आंदोलनास बसलेल्या शेतकरी बांधवांचा मागण्या मान्य करा ,तिन्ही कायदे रद्द करा, महागाई कमी करा या मागण्यासह शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारत बंद ला पाठिंबा देत काँग्रेस ने धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय येथे केले. वाढत्या महागाईचा निषेध करत जिल्हाधिकाऱयांना निवेदनही देण्यात आले. यावेळी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. जाधव, महिला जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, शहर अध्यक्ष राजिया शेख, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष तपासे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी काळे कायदे रद्द करा, शेतकऱयांना न्याय मिळालाच पहिजे. अखिल भारतीय कॉग्रेस पक्षाचा विजय असो, सोनिया गांधीचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी धनश्री महाडिक म्हणाल्या, 130 दिवस झाले शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. तरीही केंद्र सरकार याला गांभीर्यांने घेत नाही. अनेक प्रश्न उपस्थित होत असून या प्रश्नाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. महागाईचा भडका उडवून सर्वसामान्य जनतेची पिळवणूक सूरू आहे. लोकांपुढे जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. हे काळे कायदे रद्द करा आणि महागाई कमी करा ही च मागणी आम्ही करत आहोत.