सांगली प्रतिनिधी
मुसळर पावसामुळे पूर येऊन नुकसान झालेल्यांना राज्य शासनाकडून मदत जाहीर झली आहे. परंतु अनेकांना ही मदत मिळालेली नाही. दरम्यन, पूरग्रस्त नागरिकांच्या बरोबरच व्यापारी, शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित असून राज्य शासनाने पूरग्रस्त शेतकरी व व्यापारी यांना भरीव मदत करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीचे पृथ्वीराज पवार व कार्यकर्त्यांच्या वतीने मंगळवारी सांगली शहरात निदर्शने केली. स्टेशन चौक ते काँग्रेस कमिटी या मार्गावर रॅली काढून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच तातडीने मदत न केल्यास आणखी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात चंद्रकांत सूर्यवंशी, रेखा पाटील यांच्यासह पूरग्रस्त व्यापारी शेतकरी व नागरिक सहभागी झाले होते.