हातकणंगले / प्रतिनिधी
शेतकरी व कामगार विरोधी कायदे रद्द करावे ह्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा व अ.भा.जनवादी महिला संघटना आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स ( सिटू) यांच्या वतीने हातकणंगले तहसिल कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले.
केंद्रातील भाजपा सरकार गेल्या वर्षाभरापासून सर्व सामान्य जनतेला देशोधडीला लावले आहे. देशात कोरोनोमुळे सर्वसामान्य कामगार व शेतकरी वर्ग मोडकळीस गेला आहे. ह्या महामारीच्या काळात सर्वसामान्य लोकांच्या नोकऱ्या व रोजगार बुडाला आहे. यावर उपाययोजना न काढता केंद्रातील भाजप सरकार कामगार व शेतकरी यांना विश्वासात न घेता बहुमताच्या जोरावर संसदेत चर्चा न करता मुठभर भांडवलदार यांच्या फायद्यापोटी हा खटाटोप चालवत शेतकरी व कामगार विरोधी कायदे लागू करून कामगार व शेतकरी वर्गावर अन्याय करीत आहे. केंद्र सरकारच्या या धोरणा विरोधात आज हातकणंगले तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी केंद्र सरकार विरोधी घोषणाबाजी करून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला यावेळी अ.भा. किसान सभेचे कॉ. आप्पा परीट, कॉ. विकास पाटील, कॉ. अनिल जंगले, कॉ. राज शिंदे, कॉ. अमोल नाईक, तसेच अ.भा.जनवादी महिला समितीच्या कॉ. मुमताज हैदर, शशिकला मगदुम, अनिता वड्ड, पूनम बुकटे, गुंडू पाटील, कॉ. सनदी आदीनी आंदोलनात सहभागी होते.